शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

क्षेत्रविकासातून साकारणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: October 23, 2015 22:23 IST

महापालिकेतर्फे कार्यशाळा : लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या संकल्पनांची हवी जोड

नाशिक : हरितक्षेत्र, पुनर्विकास आणि रेट्रोफिटिंग या क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांच्या माध्यमातून नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचे स्वप्न महापालिकेच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दाखविण्यात आले. स्वप्ननगरी प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच घरपट्टी-पाणीपट्टी करवाढीचेही संकेत प्रशासनाकडून यावेळी देण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून ‘स्मार्ट सिटी’ घडविण्याचा निर्धार करण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पहिल्या टप्प्यात नाशिक शहराची निवड झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पात्र होण्यासाठी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या संकल्पना-सहकार्यातून प्रस्ताव तयार केला जाणार असून, तो ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे नगरसेवक आणि शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांसाठी महाकवी कालिदास कलामंदिरात दोन सत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दोन्ही सत्रांत मार्गदर्शन करत नाशिक महापालिकेची सद्यस्थिती आणि भविष्यात राबवायच्या योजनांची माहिती दिली. गेडाम यांनी सांगितले, शहरांना स्वत:च्या पायावर उभे करणारे स्मार्ट सिटी अभियान आहे. या अभियानात वेगवेगळ्या संकल्पना ‘पीपीपी’च्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून राबविण्यावर भर राहणार आहे. क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांतून स्मार्ट सिटी निर्माण करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट भाग निवडायचा असून, हरितक्षेत्र विकासासाठी सुमारे ५०० एकर जागा अपेक्षित आहे, तर पुनर्विकासासाठी २५० एकर आणि रेट्रोफिटिंगसाठी ५० एकर क्षेत्राची गरज भासणार आहे. सदर भाग निवडताना एकमत होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठून सुरुवात करायची याचा निर्णय महापालिकेच्या महासभेने घ्यायचा आहे. आहे त्या परिस्थितीत सुधारणा रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून करता येऊ शकेल.

उदासीन लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिकमहापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात दोन सत्रांत कार्यशाळा आयोजित केली होती. पहिले सत्र खास नगरसेवकांसाठी ठेवण्यात आले, तर दुसरे सत्र नागरिकांसह विविध संघटनांसाठी खुले होते. मात्र, नगरसेवकांसाठी ठेवण्यात आलेल्या सत्राला १२७ पैकी अवघ्या ३५ ते ४0 नगरसेवकांनीच हजेरी लावली. त्यातही प्रामुख्याने मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांचा सर्वाधिक सहभाग होता. केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी भाजपाच्या आमदार सीमा हिरे, गटनेते संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, कुणाल वाघ यांची उपस्थिती लाभली, परंतु दीपप्रज्वलन झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी सभागृह सोडले. शिवसेनेच्या नगरसेवकांचीही अनुपस्थिती दिसून आली. दुसर्‍या सत्राला मात्र कालिदास कलामंदिर नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. त्यात तुलनेने कमी असलेल्या स्मार्ट नाशिककरांचीही संख्या चर्चेचा विषय ठरली.