शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

गाेदावरीतून गाळ उपसा की वाळू उपशाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

नाशिक : पुराची तीव्रता कमी करण्यासाठी गोदापात्रातील गाळ काढण्याचे ठरले आणि गाळाऐवजी वाळूच अधिक निघाली. त्यासंदर्भात महसूल विभागाकडे रॉयल्टी ...

नाशिक : पुराची तीव्रता कमी करण्यासाठी गोदापात्रातील गाळ काढण्याचे ठरले आणि गाळाऐवजी वाळूच अधिक निघाली. त्यासंदर्भात महसूल विभागाकडे रॉयल्टी भरण्यात आली खरी; मात्र, हा गाळ काढण्याचा ठेका की वाळू उपशाचा हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे येथील वाळू उपसा करणे पर्यावरणदृष्ट्या घातक आहे, असा आक्षेप पर्यावरणप्रेमींनी घेऊनदेखील त्यावर कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

स्मार्ट सिटीची मूळ संकल्पना ही पर्यावरण स्नेही असून, शाश्वत विकासासाठी संतुलन ढासळू देऊ नये ही खरी जागतिक संकल्पना आहे. मात्र, प्रत्यक्षात गाेदावरीच्या बाबतीत तसे झालेले दिसत नाही. शहरातील पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढावा, अशी सूचना होती. त्यानुसार मते नर्सरी ते होळकर पुलाच्या दरम्यान गाळ काढण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे; परंतु अपेक्षित प्रमाणात गाळ आढळून तर आला नाहीच उलट तेथे वाळू आढळल्याचे सांगण्यात येते. तेथे वाळू आढळल्यावर महसूल विभागाला स्वामित्वधन देण्यात आले. मात्र, कंपनीच्या करारानुसार अशाप्रकारचे गौण खनिज महापालिकेच्या मालकीची असेल असा स्पष्ट मुद्दा असतानाही त्यावर कार्यवाही झालेली नाही, असा आक्षेप कंपनीच्या काही संचालकांनी घेतला हाेता, तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी वाळू उपशावर आक्षेप घेतल्यानंतरदेखील त्यावर कार्यवाही झालेली नाही. नदीच्या प्रवाहासाठी वाळू आवश्यक असते. त्यामुळे ती काढू नये अशाप्रकारची गोदावरी शुद्धिकरणासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी मागणी केली. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने त्यावरदेखील कार्यवाही केली नाही. त्यामुळेच नदीतील गाळ काढण्याचा कंपनीचा अट्टहास आहे की, वाळूचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या कामाची मुदत संपल्यानंतरदेखील काम सुरूच असून, मुदतवाढीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातच नदीपात्रातील गाळ काढून नदीच्या तीरावरच ठेवण्यात येत असल्याने पावसाळ्यात गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जाईल, अशी तक्रार ॲड. सुयोग शहा आणि वास्तुविशारद सागर काबरे यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यावर महापालिकेने स्मार्ट सिटीकडे पत्रापत्री करून कंपनीचे उत्तर पाठवले असून, त्यात मूळ प्रश्नालाच बगल देण्यात आली आहे. त्यामुळेच स्मार्ट सिटीचे नक्की काय चाललंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इन्फो....

कामाची माहिती देणारा फलकच केला गायब

कोणत्याही कामाच्या ठिकाणी काय काम सुरू आहे, त्याचा कालावधी आणि मक्तेदार काेण याच्या माहितीचा फलक आवश्यक असतो. ॲड. सुयोग शहा आणि सागर काबरे यांनी एक महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीच्या गाळासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीचे समाधान तर नाहीच; परंतु नदी काठी लावलेला फलकच गायब करण्यात आला आहे.

---------

छायाचित्र आर फोटोवर ०७ स्मार्ट सिटी