शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

अतिउष्णतेमुळे चाळीतच सडतोय कांदा

By admin | Updated: June 19, 2016 00:32 IST

आगीतून उठून फुफाट्यात : शेतकऱ्यांना केवळ दोनशे रु पये भाव

 येवला : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिवापाड मेहनत करून शेतकऱ्यांनी कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतले. मात्र कांद्याची आवक जास्त झाल्याने भाव घसरले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अपेक्षित किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भावासाठी चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे आता पदरचे पैसे खर्च करून कांद्याची विल्हेवाट लावण्यास भाग पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.अनेक ठिकाणी चाळीत असलेल्या कांद्याचे पाणी गळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा एकदा मनुष्यबळ घेऊन सडका कांदा चाळीतून बाहेर काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर शेतकरी पैसा खर्च करू लागला आहे. कांदा फेकताना शेतकऱ्यांच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू गोळा होत आहेत. भरवशाचा, टिकावू, निर्यातक्षम, वजनदार अन् अधिक बाजारभाव देणारा अशी ओळख असलेला उन्हाळ कांदा खरीप व रब्बी हंगामापेक्षा उन्हाळ कांदा शेतकऱ्यांसाठी लाखमोलाचा ठरतोय. मात्र, यंदा याच उन्हाळ कांद्याने संपूर्ण गणितेच बिघडवून टाकली आहेत, ते शासनाच्या धोरणांमुळे. साठवलेल्या कांद्याला दोन हजाराचा भाव मिळेल, या आशेवर अजूनही जिल्ह्यात २५ ते ३० टक्के कांदा चाळीतच आहे. एकीकडे बाजारभाव वाढत नाही. लाल कांदाही बाजारात विक्र ीला येत आहे, तर चाळीतला कांदाही सडत असल्याने भविष्य काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.शेतकऱ्यांनी पाच महिन्यांपासून जिवापाड जपून चाळीत साठवलेल्या कांद्याला बाराशे रुपयांच्या पुढे बाजारभाव जाऊ लागले, तोच केंद्र शासनाने निर्यातबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतला होता. लोकप्रतिनिधी व शेतकरी, व्यापाऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र शासनाने निर्यात खुली करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, दिल्ली तसेच पंजाब आदि राज्यांत कांदा जात आहे. मात्र मागणीचे प्रमाण अतिशय कमी आहे. परदेशात अत्यल्प मागणी आहे. त्याचमुळे निर्यात खुली होऊनही कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी-कमीच होत आहे ही चिंतेची बाब आहे. तसेच शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेल्या कांद्याला उतरती कळा लागली आहे. (वार्ताहर)