शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अतिउष्णतेमुळे चाळीतच सडतोय कांदा

By admin | Updated: June 19, 2016 00:32 IST

आगीतून उठून फुफाट्यात : शेतकऱ्यांना केवळ दोनशे रु पये भाव

 येवला : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिवापाड मेहनत करून शेतकऱ्यांनी कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतले. मात्र कांद्याची आवक जास्त झाल्याने भाव घसरले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अपेक्षित किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भावासाठी चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे आता पदरचे पैसे खर्च करून कांद्याची विल्हेवाट लावण्यास भाग पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.अनेक ठिकाणी चाळीत असलेल्या कांद्याचे पाणी गळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा एकदा मनुष्यबळ घेऊन सडका कांदा चाळीतून बाहेर काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर शेतकरी पैसा खर्च करू लागला आहे. कांदा फेकताना शेतकऱ्यांच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू गोळा होत आहेत. भरवशाचा, टिकावू, निर्यातक्षम, वजनदार अन् अधिक बाजारभाव देणारा अशी ओळख असलेला उन्हाळ कांदा खरीप व रब्बी हंगामापेक्षा उन्हाळ कांदा शेतकऱ्यांसाठी लाखमोलाचा ठरतोय. मात्र, यंदा याच उन्हाळ कांद्याने संपूर्ण गणितेच बिघडवून टाकली आहेत, ते शासनाच्या धोरणांमुळे. साठवलेल्या कांद्याला दोन हजाराचा भाव मिळेल, या आशेवर अजूनही जिल्ह्यात २५ ते ३० टक्के कांदा चाळीतच आहे. एकीकडे बाजारभाव वाढत नाही. लाल कांदाही बाजारात विक्र ीला येत आहे, तर चाळीतला कांदाही सडत असल्याने भविष्य काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.शेतकऱ्यांनी पाच महिन्यांपासून जिवापाड जपून चाळीत साठवलेल्या कांद्याला बाराशे रुपयांच्या पुढे बाजारभाव जाऊ लागले, तोच केंद्र शासनाने निर्यातबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतला होता. लोकप्रतिनिधी व शेतकरी, व्यापाऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र शासनाने निर्यात खुली करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, दिल्ली तसेच पंजाब आदि राज्यांत कांदा जात आहे. मात्र मागणीचे प्रमाण अतिशय कमी आहे. परदेशात अत्यल्प मागणी आहे. त्याचमुळे निर्यात खुली होऊनही कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी-कमीच होत आहे ही चिंतेची बाब आहे. तसेच शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेल्या कांद्याला उतरती कळा लागली आहे. (वार्ताहर)