शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

बनावट खते, बियाण्यांचा शोध घेण्यासाठी सोळा भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:50 IST

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त

ठळक मुद्देकृषी विभाग : गुरुवारपासून तालुकानिहाय दुकानांची तपासणी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मान्सूनचे आगमन तोंडावर आले असून, शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीची तयारी केली जात असताना बी-बियाणे व खतांच्या वापरात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सोळा भरारी पथके गठित केली असून, गुरुवारपासून जिल्हाभरात तालुकानिहाय खते, बियाण्यांच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कापूस व भाताच्या वाणाची प्रामुख्याने तपासणी केली जाणार आहे.

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त झाली असून, बी-बियाण्यांच्या बाबतीतही समाधानकार परिस्थिती असल्याचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यंदा खरिपाचे पीकनिहाय लागवडीचे क्षेत्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पिके घेण्यासाठी लागणाºया बी-बियाण्यांचा सातत्याने आढावा घेतला जात असून, बाजारातून मिळणाºया बियाण्यातून शेतकºयांची फसवणूक होऊ नये यासाठी फर्टिलायझर दुकानात जाऊन तपासणीसाठी नमुने घेण्यात येतील तसेच शासनाने बंदी घातलेल्या बियाणांची विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सोळा भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकात कृषी अधिकारी, वजनमाप निरीक्षक, कृषी सहायक, ग्रामसेवकाचा समावेश आहे. गुरुवारपासून पथके प्रत्येक तालुकानिहाय फर्टिलायझरच्या दुकानात जाऊन तपासणी करतील. मान्सूनची सुरुवात झाल्यावर पहिल्या पावसानंतर प्रामुख्याने भात व कापसाची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. तो लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात भात व कापसाचे वाण तपासण्यावर पथकाचा भर असून, त्यातही कापसावर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी, तुडतुड्याचा प्रभाव पाहता, यंदा लागवडीपासूनच त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महाराष्टÑात गुजरात व आंध्र प्रदेशातून कापसाचे वाण येते, नेमके या वाणातूनच शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आजवरच्या तपासणीअंती निष्पन्न झाल्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही राज्यांतील सीमा तसेच या सीमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील गावांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतकºयांनीदेखील कृषी अधिकाºयाच्या सल्ल्यानेच बी-बियाणांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद