शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

मालेगावातील सहा हजार रिक्षाचालकांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST

कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष कसेबसे घालवले. काहींनी रिक्षा विकून टाकल्या अन् मिळेल ते काम सुरू केले. ...

कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष कसेबसे घालवले. काहींनी रिक्षा विकून टाकल्या अन् मिळेल ते काम सुरू केले. त्यात पेट्रोलच्या किमतीही भरमसाट वाढल्या. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. लोकांकडून कर्ज घेऊन मागचे वर्ष कसबसे लोटले, त्यानंतर व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर कसाबसा रिक्षा व्यवसाय सुरू झाला. घरी चूल पेटू लागली तर पुन्हा कोरोना वाढला आणि शासनाने निर्बंध लादले. निर्बंध कडक केल्याने एका वेळी पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवता येत नाहीत. मर्यादित प्रवाशांचे निर्बंध असल्याने आणि कोरोनाची दहशत असल्याने प्रवासी रिक्षात बसेनासे झाले आहे. रोज सकाळी रिक्षा सॅनिटाइझ करायचा खर्चही वाढला. त्यात कोण प्रवासी कसा याची शाश्वती नसल्याने बाधित प्रवासी आल्यास आपल्याला कोरोना होईल अशी रिक्षा चालकांना भीती वाटते. त्यामुळे स्वतः रिक्षा चालक दहशतीत असताना त्याच्या कुटुंबीयांनादेखील भीती वाटते. या निर्बंधांमुळे रिक्षा चालकांची उपासमार होऊ लागली असून शासनाची पंधराशे रुपयांच्या मदतीची घोषणा हवेतच विरते की काय? असे वाटू लागले आहे.

इन्फो

खरे रिक्षा चालक दूरच

बरेच लोक रिक्षाचे परवाने काढून रिक्षा भाड्याने देतात. राज्य शासनाकडून केवळ परवानाधारक रिक्षामालकांना पंधराशे रुपयांची मदत मिळणार असल्याने रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोट....

मालेगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत काम सुरू आहे. तालुक्यात साडे सहा हजार परवानाधारक रिक्षा चालक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली जात आहे.

- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

फोटो - ०४ ॲटो

===Photopath===

040521\04nsk_14_04052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०४ ॲटो