शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

सहा दुकाने फोडली

By admin | Updated: July 17, 2014 22:01 IST

न्रशिक : रविवार पेठेमधील व्यापारी भागात सहा ते सात चोरट्यांच्या टोळक्याने सहा दुकानांचे शटर फोडून एकूण एक लाख नऊ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

पनवेल : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण भरले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा हे धरण उशिरा भरले असले तरी लवकरच धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सुभाष भुजबळ यांनी दिली. परिणामी, पनवेलकरांची एप्रिल महिन्यापर्यंत चिंता मिटली आहे.माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची २७७ हेक्टर जमीन असून, त्यातील १२५ क्षेत्रावर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच नगरपालिका आहे. या ठिकाणाहून जलवाहिनीद्वारे पनवेल शहराला पाणी पुरविण्याचा संकल्प केला होता. परंतु एमजेपी आणि ठेकेदारांच्या वादामुळे ही भुर्दंड पालिकेला बसला. पूर्वी जलाशयाची साठवणूक क्षमता जास्त होती मात्र २००५ साली झालेल्या महाप्रलयात माथेरानच्या डोंगराची माती वाहून येऊन ती देहरंग धरणात येऊन बसली. त्यामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली. त्याचा परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला एप्रिल महिन्यापर्यंत दररोज १२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वास्तविक पाहता पनवेलची गरज दुप्पट आहे. म्हणून पालिका एमजेपी, एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवले जाते. उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही देहरंग धरण कोरडे पडले होते. त्यामुळे गेले पाच महिने पालिका पाण्यासाठी पूर्णत: एमजेपी आणि एमआयडीसीवर अवलंबून होती. पाण्यापोटी प्रशासनाला मोठी रक्कम या दोन्ही यंत्रणांना मोजावी लागत आहे. दरवर्षी जून महिन्यात हे धरण सांडवा पातळी गाठत असते. मात्र यंदा पाऊस लांबला. पूर्ण जून महिना आणि जुलैचे सुरुवातीचे काही दिवस कोरडे गेले. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. पावसाने दडी मारल्याने देहरंग धरण भरते की नाही अशी चिंता प्रशासनाला लागली होती. मात्र सुदैवाने गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरण भरले आहे. त्यामुळे गोडबोले गेटही उघडण्यात आले आहे. माथेरान आणि हजीमलंगच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने पाणी गढूळ झाले आहे. परिणामी दोन दिवसांत गाळ निवळल्यानंतर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.