शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

सहा टक्के मते वाढली

By admin | Updated: February 23, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद : कळवण, निफाड, नांदगाव आघाडीवर

नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६.८० टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेली उपाययोजना व मतदान करवून घेण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवार, समर्थकांचे प्रयत्न कामी आले आहेत.  नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी जिल्ह्यातील २६४६ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्काराच्या घटना घडल्या असल्या तरी, संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी २४ लाख २६ हजार ७३५ एकूण मतदार पात्र होते. त्यात १२ लाख ७४ हजार २५२ पुरुष व ११ लाख ५२ हजार ४७९ महिलांचा समावेश होता. त्यापैकी मंगळवारी ९ लाख ६ हजार ९८५ पुरुष व ७ लाख ६७ हजार ५१९ महिला अशा प्रकारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी मतदान केले.  सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी ६.८० टक्क्याने अधिक असून, २०१२ मध्ये जिल्ह्यातील ६२.२० टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यामानाने   यंदा मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या  निवडणुकीच्या तुलनेत कळवण, निफाड व नांदगाव या तीन तालुक्यांत मतांच्या टक्केवारीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यात पेठ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ७६.५७ टक्के इतके मतदान झाले आहे.  गेल्या निवडणुकीत हाच विक्रम सुरगाणा तालुक्यात नोंदविला गेला होता. २०१२ मध्ये सुरगाणा तालुक्यात ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या निवडणुकीत मात्र सुरगाण्याची टक्केवारी कमालीची घटली आहे. जवळपास अकरा टक्के मतदान या तालुक्यात घटल्याची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. (प्रतिनिधी)