शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सहा टक्के मते वाढली

By admin | Updated: February 23, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद : कळवण, निफाड, नांदगाव आघाडीवर

नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६.८० टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेली उपाययोजना व मतदान करवून घेण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवार, समर्थकांचे प्रयत्न कामी आले आहेत.  नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी जिल्ह्यातील २६४६ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्काराच्या घटना घडल्या असल्या तरी, संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी २४ लाख २६ हजार ७३५ एकूण मतदार पात्र होते. त्यात १२ लाख ७४ हजार २५२ पुरुष व ११ लाख ५२ हजार ४७९ महिलांचा समावेश होता. त्यापैकी मंगळवारी ९ लाख ६ हजार ९८५ पुरुष व ७ लाख ६७ हजार ५१९ महिला अशा प्रकारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी मतदान केले.  सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी ६.८० टक्क्याने अधिक असून, २०१२ मध्ये जिल्ह्यातील ६२.२० टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यामानाने   यंदा मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या  निवडणुकीच्या तुलनेत कळवण, निफाड व नांदगाव या तीन तालुक्यांत मतांच्या टक्केवारीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यात पेठ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ७६.५७ टक्के इतके मतदान झाले आहे.  गेल्या निवडणुकीत हाच विक्रम सुरगाणा तालुक्यात नोंदविला गेला होता. २०१२ मध्ये सुरगाणा तालुक्यात ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या निवडणुकीत मात्र सुरगाण्याची टक्केवारी कमालीची घटली आहे. जवळपास अकरा टक्के मतदान या तालुक्यात घटल्याची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. (प्रतिनिधी)