शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

पालखीसाठी पंचायत समितीचे सहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:58 IST

शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला.

नाशिक : शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला. अर्थात, यावेळी नाशिक पंचायत समितीतर्फे सहा लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती देण्यात आली, तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही संताची शिकवण सांगून टोलेबाजी केली.  त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ महाराजांसह तुकाराम माउलींच्या नामस्मरण करण्यात आलेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी एका वक्त्याने पालखी स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीने सहा लाख रुपये दिल्याची जाणीव करून दिली. त्यावर महापौर रंजना भानसी यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी पालखीचे स्वागत केल्याचा आनंद होत असल्याचे नमूद केले, तर हा सोहळा पंचायत समितीच्या ठिकाणी घेण्यास कारणीभूत ठरलेले पडद्यामागचे सूत्रधार म्हणून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी स्वागत सोहळ्याच्या वादाचा सुरुवातीसच उल्लेख केला. गेल्या काही दिवसांपासून हा विषय गाजत असला तरी त्यावर पालखी स्वागत सोहळा समितीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि आपणही दिली नाही. ही संत शिकवणीची परंपरा असल्याचे नमूद केले. यावेळी बाळासाहेब सानप, जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पद्माकर पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी दिंंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्यवरांनी आश्वासन दिले.स्वागत व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी केले. आभार सचिन डोंगरे यांनी केले. यावेळी त्र्यंबकराव गायकवाड, भारत ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पंढरपूर येथे केलेल्या हागणदारीमुक्त कामाची माहिती दिली. या कामामुळे आपल्याला देशभरातून सहाशे ते सातशे पत्र आले व त्यांनी चंद्रभागा नदी घाणीपासून मुक्त केल्याबद्दल आभार मानल्याचे सांगितले, तर जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख यांनी आपण पंढरपूर येथे सेवा बजावली आणि आता संत निवृत्तिनाथांच्या नगरीत आल्याचे नमूद केले.  विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पांडुरंगाच्या चरणी नाशिक जिल्ह्यात पाऊस पडू दे, अशी विनवणी करण्याचे आवाहन केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकरी नाशिक जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण देशातच आहे. शिवाय जगभरात पाऊस पडून समृद्धी राहो अशी प्रार्थना करण्याची सूचना केली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद