शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पालखीसाठी पंचायत समितीचे सहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:58 IST

शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला.

नाशिक : शासन आदेशानुसार महापालिकेने संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी व्यासपीठाचा खर्च नाकारल्यानंतर नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी पंथाच्या कार्याचे गौरव करतानाच त्यांना सुविधा देण्यावर भर देण्यात आला. अर्थात, यावेळी नाशिक पंचायत समितीतर्फे सहा लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती देण्यात आली, तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही संताची शिकवण सांगून टोलेबाजी केली.  त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नाशिक पंचायत समितीच्या आवारात स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ महाराजांसह तुकाराम माउलींच्या नामस्मरण करण्यात आलेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे, पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, उपमहापौर प्रथमेश गिते तसेच संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी एका वक्त्याने पालखी स्वागत सोहळ्यासाठी नाशिक पंचायत समितीने सहा लाख रुपये दिल्याची जाणीव करून दिली. त्यावर महापौर रंजना भानसी यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी पालखीचे स्वागत केल्याचा आनंद होत असल्याचे नमूद केले, तर हा सोहळा पंचायत समितीच्या ठिकाणी घेण्यास कारणीभूत ठरलेले पडद्यामागचे सूत्रधार म्हणून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी स्वागत सोहळ्याच्या वादाचा सुरुवातीसच उल्लेख केला. गेल्या काही दिवसांपासून हा विषय गाजत असला तरी त्यावर पालखी स्वागत सोहळा समितीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि आपणही दिली नाही. ही संत शिकवणीची परंपरा असल्याचे नमूद केले. यावेळी बाळासाहेब सानप, जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पद्माकर पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी दिंंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्यवरांनी आश्वासन दिले.स्वागत व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी केले. आभार सचिन डोंगरे यांनी केले. यावेळी त्र्यंबकराव गायकवाड, भारत ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना पंढरपूर येथे केलेल्या हागणदारीमुक्त कामाची माहिती दिली. या कामामुळे आपल्याला देशभरातून सहाशे ते सातशे पत्र आले व त्यांनी चंद्रभागा नदी घाणीपासून मुक्त केल्याबद्दल आभार मानल्याचे सांगितले, तर जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख यांनी आपण पंढरपूर येथे सेवा बजावली आणि आता संत निवृत्तिनाथांच्या नगरीत आल्याचे नमूद केले.  विशेष म्हणजे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पांडुरंगाच्या चरणी नाशिक जिल्ह्यात पाऊस पडू दे, अशी विनवणी करण्याचे आवाहन केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकरी नाशिक जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण देशातच आहे. शिवाय जगभरात पाऊस पडून समृद्धी राहो अशी प्रार्थना करण्याची सूचना केली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद