शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रेल्वेस्थानकावर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:39 IST

कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या.

नाशिकरोड : कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या. कसाºयाजवळील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अतिवृष्टी व दरड कोसळल्याने मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रेल्वे रूळावरून घसरून मोठा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने रेल्वे रूळ व ओव्हरहेड वायरचे खांब उखडून गेले. यामुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद पडली आहे. आसनगांव जवळ दुरांतोला झालेल्या अपघातामुळे मंगळवारी अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या रेल्वे मोठ्या उशिराने धावत होत्या. तर अनेक रेल्वे अर्ध्या मार्गावरून माघारी फिरविण्यात आल्या. अपघातानंतर मंगळवारी मुंबई व आजूबाजूच्या भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत पावसाची सुरू असलेली संततधार कमी झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला होता.चोवीस तासांत केवळ एकच गाडीनाशिकरोड रेल्वेस्थानकावर २४ तासांत ६२ रेल्वे येतात व जातात; मात्र मंगळवारी दुपारी १२ वाजता इगतपुरी येथून माघारी बोलविलेली पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोडवरून मनमाडला रवाना झाल्यानंतर २४ तास बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकही रेल्वे नाशिकरोड मार्गे धावली नव्हती. बुधवारीदेखील दोन-चार रेल्वे येऊन गेल्या. यामुळे नाशिकरोड रेल्वे- स्थानकावर सर्वत्र शांतता पसरली होती. रेल्वे व प्रवासी येत-जात नसल्याने स्थानका बाहेरील रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डवरील गाड्यांची संख्या रोडावली होती.नाशिककरांसाठी स्पेशल रेल्वेरेल्वे प्रशासनाने नाशिककर व प्रवाशांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता मनमाड येथुन देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकापर्यंत शटलप्रमाणे स्पेशल रेल्वे सोडली होती. तीच स्पेशल ट्रेन देवळाली कॅम्प येथुन सायंकाळी ६ वाजता मनमाडच्या दिशेने रवाना झाली. तर मनमाड-इगतपुरी शटल आपल्या निर्धारित वेळेला धावली. तर औरंगाबादहुन सुटलेली जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड मार्गे नाशिकरोडपर्यंत येऊन पुन्हा त्याच मार्गे माघारी गेली. तसेच गोरखपुरहून मुंबईला जाणारी गोरखपुर एक्स्प्रेस सायंकाळी नाशिकरोडहुन पुन्हा माघारी मनमाड मार्गे गोरखपुरला रवाना झाली.