शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

सिन्नरचा दुष्काळ भयंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 23:25 IST

कृषिमंत्र्यांना आमंत्रण : विधानसभेच्या चर्चासत्रात दिली पाणीटंचाईची माहिती

 सिन्नर : मराठवाडा व विदर्भात दुष्काळ भीषण आहे, याची पाहणी आपणही केली आहे; मात्र त्यापेक्षाही वाईट परिस्थिती सिन्नर तालुक्यात असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सांगितले. मराठवाड्यात चार वर्षांपासून दुष्काळ आहे. मात्र सिन्नर तालुक्यात सलग ७ वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. काही वर्षांपासून तालुक्यातील सर्व गावांची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यामुळे केवळ मराठवाडा व विदर्भाकडे दुष्काळ निवारणासंदर्भात लक्ष देऊन चालणार नाही, तर शासनाने सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्याकडेही गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली.महाराष्ट्र विधानसभेच्या नियम २९३ अन्वये दुष्काळ व दुष्काळ निवारणासंदर्भात अधिवेशनात चर्चा करताना आमदार वाजे विधानसभेत बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेतून तालुक्यातील काही गावांना कामे सुरू आहेत. पण ज्या गावांचा जलयुक्त शिवारअंतर्गत समावेश आहे त्याच गावांकडे लक्ष दिले जाते. याव्यतिरिक्त अन्य दुष्काळी गावांकडे लक्ष दिले जात नसल्याची खंत आमदार वाजे यांनी बोलून दाखविली. जलयुक्तमधील गावे दुष्काळ मुक्त होतील; परंतु इतर गावे दुष्काळीच राहतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या गावांच्या भविष्यातील दृष्टिकोनातून लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाजे यांनी सांगितले. पीक आणेवारीच्या पद्धतीत खूप तफावत असल्याबद्दल वाजे यांनी नाराजी व्यक्त केली. पूर्वी १० वर्षांची सरासरी विचारात घेतली जात होती. नवीन नियमानुसार आणेवारी ठरविणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याच्या टॅँकर संदर्भात मोठा गंभीर प्रश्न असल्याचे वाजे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पाण्याचे टॅँकर वाटप करताना फक्त माणसी हिशेब केला जात असल्याचे ते म्हणाले. जनावरांना पाणी वाटपामध्ये ग्राह्य धरले जात नाही. तालुक्यातील काही गावे दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. या गावांमधून दोन टॅँकरभरून दूधचा पुरवठा होतो. या गावांत फक्क माणसांसाठी २ पाण्याचे टॅँकर मिळत असल्याची तक्रार वाजे यांनी केली. त्यामुळे पाण्याचे टॅँकर वाटप करताना जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली. पाण्याच्या टॅँकरचे प्रस्ताव तयार करण्यास ५-६ दिवसांचा कालावधी जातो. त्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी गावात पाहणीसाठी जातात. विहिरीजवळ जाऊन विहिरीत खडे टाकून पाण्याचा अंदाज घेतात. शेतकऱ्यांनी जनावरांना पिण्यासाठी पाणी टॅँकरद्वारे विहिरीत पाणी टाकलेले असते व त्या पाण्याची पाहणी करून अधिकारी त्या गावातील टॅँकरचे प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचे विधानसभेत निदर्शनास आणून दिले. (वार्ताहर)