शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सिन्नर-नायगाव रस्त्यावर गळतीमुळे डबके साचल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:15 IST

सिन्नर-नायगाव रस्त्यावरील गोविंद गोपाळ लॉन्सजवळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने परिसरात पाण्याचे डबके साचले असून रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हे तातडीने बुजवावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

सिन्नर : सिन्नर-नायगाव रस्त्यावरील गोविंद गोपाळ लॉन्सजवळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने परिसरात पाण्याचे डबके साचले असून रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हे तातडीने बुजवावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.नायगांव रस्त्यावर अनेक निवासी इमारती असून त्यांचे सांडपाणी बंदिस्त गटारीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या छोट्या नाल्यात सोडण्यात आले आहे. नुकतेच कडवा धरणावरील पाणीपुरवठा योजनच्या पाइप लाइनचे काम पूर्ण झाले असून या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह टाकण्यात आला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून नाल्यामध्ये येणाºया सांडपाण्यामुळे तेथे मोठे डबकेच बनले आहे. त्यात कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या जगभरात ‘कोरोना’चे संकट उभे असताना परिसरातील रहिवाशांना या डबक्यामुळे वाढलेल्या डासांनी घरात बसणे अवघड केले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांमध्ये औषध फवारणी सुरु आहे. मात्र, त्यांनतरही दुर्गंधीआणि डासांपासून मुक्तता मिळालेली नाही.हे डबके बुजवण्याबाबत नगर परिषदेकडे वेळोवेळी अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, नगर परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील रहिवाशांना सध्याच्या संचारबंदीत घरात राहणे अवघड झाले आहे. नगर परिषदेने व्हॉल्व्हवरून होणाºया पाण्याची गळती थांबवावी व डबके तातडीने बुजवून आरोग्याच्या गंभीर होऊ पाहणाºया प्रश्नापासून परिसरातील रहिवाशांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.