शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दोन व्यक्तींना एकाच क्र मांकाचे आधारकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:33 IST

कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळवण या आदिवासी तालुक्यातील दोन व्यक्तींना एकच आधार क्र मांक मिळाल्याने संबंधिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देकळवण : यंत्रणेच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे तरुणांना फटका

 

 

कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळवण या आदिवासी तालुक्यातील दोन व्यक्तींना एकच आधार क्र मांक मिळाल्याने संबंधिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.केंद्र सरकारने अनेक ठिकाणी आधार क्रमांकाची सक्ती केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आधार क्र मांक मिळत असल्याने तो क्र मांकच त्या व्यक्तीची ओळख ठरते. मात्र कळवण तालुक्यातील कुंडाणे (ओ.) येथील वेदांत हिरामण देवरे व उत्तम शिवाजी पवार या दोघांच्या आधार कार्डवर एकच क्र मांक असल्याने या दोघांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दोघांच्या बँक व्यवहाराला तसेच इतर शासकीय कामांना एकच आधार क्रमांक अडथळा ठरत असून, आधार यंत्रणेच्या या मनमानी कारभारामुळे पवार व देवरे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय अनेक शासकीय योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. यासंबंधी पवार व देवरे यांनी हेल्पलाइनवर वेळोवेळी संवाद साधला असून, यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारची ठोस माहिती त्यांना दिली जात नसल्याने दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे.पवार यांनी आधी आधार कार्ड काढले असून, देवरे यांचे आधार कार्ड नंतरचे आहे. मात्र आधार यंत्रणेकडून पवार यांना नवीन कार्ड काढण्याचा सल्ला दिला गेला. आश्चर्य म्हणजे पॅनकार्डची अदलाबदली करण्याचा सल्लाही दिला गेल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार यासंबंधी तक्र ार देऊनही आधार यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवार व देवरे यांनी केला आहे.मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, कागदपत्रांच्या पूर्ततेवेळी व बँकेत काही काम असेल तर आधारक्र मांकामुळे ते होत नाही. शिष्यवृत्तीही रखडते. अनेकदा कामे होतच नाहीत. यंत्रणेच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागत असून, यावर लवकर तोडगा काढावा- वेदांत देवरे, कुंडाणेआधारवरील सारख्या क्र मांकामुळे कुठलेही काम होत नाही. प्रत्येक वेळी स्टॅम्प करून सादर करावा लागतो. स्टॅम्पसाठी आत्तापर्यंत हजारो रु पये खर्च झाले आहेत. नवीन आधार कार्ड काढण्याचा सल्ला देऊन यंत्रणा मोकळी होते. आधार यंत्रणेच्या अशा गलथान कारभारामुळे प्रचंड मनस्ताप होत असून, ही चूक करणाऱ्यांवर कारवाई करावा व आमची समस्या सोडवावी.- उत्तम पवार, कुंडाणे