शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सिंगल न्यूज-५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

मालेगाव : थंडी वाढू लागली असून शहरातील क्रीडा संकुलावर व्यायामपटूंची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. व्यायाम आरोग्यासाठी ...

मालेगाव : थंडी वाढू लागली असून शहरातील क्रीडा संकुलावर व्यायामपटूंची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. व्यायाम आरोग्यासाठी पोषक असल्याने काही लोक खारीक, खोबरे, बदाम असे पौष्टिक सुका मेवा खरेदी करत आहेत. नागरिक भल्या सकाळी चालण्यासाठी नामपूर रस्त्यावर तसेच पोलीस कवायत मैदानावर व्यायाम करण्यासाठी येत आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------

थंडीमुळे रस्ते रात्री निर्मनुष्य

मालेगाव: शहर परिसरात थंडीचा जोर वाढल्यामुळे रात्री तसेच भल्या पहाटे कामानिमित्त निघणाऱ्या लोकांची संख्या घटली असून गारठ्यापासून बचावासाठी शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत. त्यामुळे रात्री आठ वाजेनंतर गर्दी ओसरत असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याने रात्री अघोषित संचारबंदीचे स्वरूप रस्त्यांना येत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

वाहक चालकांनाही मास्क सक्ती करा

मालेगाव: शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा, टॅक्सीसह वाहने धावत असून वाहनचालक तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येते. मास्क न लावता रिक्षात प्रवाशांना बसविणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करावी, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी. रिक्षांसह प्रवासी वाहने सॅनेटाईज केली जात नसल्याची तक्रार असून सर्वच वाहनचालकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात यावी.

----------------------------------------------------------------------------------------------------------उड्डाण पुलाला अतिक्रमणांचा विळखा

मालेगाव: शहरातील नवीन बसस्थानकाजवळ बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम अपूर्णावस्थेत असून त्या आधीच पुलाजवळ अतिक्रमणांनी वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर पुलाखाली चक्क खुर्च्या टाकून हॉटेल थाटले असून चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये बसणाऱ्या लोकांची गर्दी होऊ लागली आहे. पुलाजवळील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून पुलाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------येसगाव-चंदनपुरी रस्ता दुरुस्तीची मागणी

मालेगाव: तालुक्यातील चंदनपुरी-येसगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना सर्कस करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून डांबर गायब झाले आहे. खड्डे चुकविताना अनेक अपघातही झाले आहेत.