शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

सिंधुदुर्ग घटनेचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 23:35 IST

महसूल-पोलीस खात्यांत अस्वस्थता : सोशल मीडियावर टीकेचे मोहोळ

 नाशिक : सिंधुदुर्ग येथे डंपर चालकांचे चिघळलेले आंदोलन हाताळणाऱ्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या तर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने राज्यातील महसूल व पोलीस खात्यांतील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चौफेर टीका करतानाच मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आमदार नीतेश राणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारणे व पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देणे, या दोन्ही घटनांचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा केली, तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची चौकशी करून नंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राज्याच्या प्रमुखाकडून घडलेल्या घटनेविषयी अधिकाऱ्यांची बाजू न ऐकून घेता करण्यात आलेल्या या कारवाईचे तीव्र पडसाद महसूल व पोलीस यंत्रणेत उमटले. जाहीरपणे याची वाच्यता करता येत नसल्याने सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची मोडतोड व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे सरकारला अभिप्रेत होते काय, असा सवाल करून, तसे करू दिले असते तर जिल्हाधिकाऱ्यांची सुरक्षितता कशी राहिली असती, अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्रातील प्रशासनाचे मनोधैर्य अगोदरच खच्चीकरण झालेले असून, कारवाई केली तरी अडचण आणि नाही केली तरीही अडचण अशी परिस्थिती असताना सरकार बदलले तरी राजकीय पक्षांची संधिसाधू व घातक वृत्ती कायम असल्याचे म्हटले आहे. नितांत सचोटी व तत्त्वाच्या कायम गप्पा मारणारे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कर्तव्यदक्ष मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आता अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतात की स्वत:ची कातडी वाचवतात हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)