शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

सिंधुदुर्ग घटनेचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 23:35 IST

महसूल-पोलीस खात्यांत अस्वस्थता : सोशल मीडियावर टीकेचे मोहोळ

 नाशिक : सिंधुदुर्ग येथे डंपर चालकांचे चिघळलेले आंदोलन हाताळणाऱ्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या तर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने राज्यातील महसूल व पोलीस खात्यांतील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चौफेर टीका करतानाच मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आमदार नीतेश राणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारणे व पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देणे, या दोन्ही घटनांचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा केली, तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची चौकशी करून नंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राज्याच्या प्रमुखाकडून घडलेल्या घटनेविषयी अधिकाऱ्यांची बाजू न ऐकून घेता करण्यात आलेल्या या कारवाईचे तीव्र पडसाद महसूल व पोलीस यंत्रणेत उमटले. जाहीरपणे याची वाच्यता करता येत नसल्याने सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची मोडतोड व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे सरकारला अभिप्रेत होते काय, असा सवाल करून, तसे करू दिले असते तर जिल्हाधिकाऱ्यांची सुरक्षितता कशी राहिली असती, अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्रातील प्रशासनाचे मनोधैर्य अगोदरच खच्चीकरण झालेले असून, कारवाई केली तरी अडचण आणि नाही केली तरीही अडचण अशी परिस्थिती असताना सरकार बदलले तरी राजकीय पक्षांची संधिसाधू व घातक वृत्ती कायम असल्याचे म्हटले आहे. नितांत सचोटी व तत्त्वाच्या कायम गप्पा मारणारे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कर्तव्यदक्ष मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आता अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतात की स्वत:ची कातडी वाचवतात हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)