शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग घटनेचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 23:35 IST

महसूल-पोलीस खात्यांत अस्वस्थता : सोशल मीडियावर टीकेचे मोहोळ

 नाशिक : सिंधुदुर्ग येथे डंपर चालकांचे चिघळलेले आंदोलन हाताळणाऱ्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या तर जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने राज्यातील महसूल व पोलीस खात्यांतील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर चौफेर टीका करतानाच मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आमदार नीतेश राणे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारणे व पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देणे, या दोन्ही घटनांचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा केली, तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची चौकशी करून नंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राज्याच्या प्रमुखाकडून घडलेल्या घटनेविषयी अधिकाऱ्यांची बाजू न ऐकून घेता करण्यात आलेल्या या कारवाईचे तीव्र पडसाद महसूल व पोलीस यंत्रणेत उमटले. जाहीरपणे याची वाच्यता करता येत नसल्याने सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची मोडतोड व जाळपोळ केली जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणे सरकारला अभिप्रेत होते काय, असा सवाल करून, तसे करू दिले असते तर जिल्हाधिकाऱ्यांची सुरक्षितता कशी राहिली असती, अशी विचारणा केली आहे. महाराष्ट्रातील प्रशासनाचे मनोधैर्य अगोदरच खच्चीकरण झालेले असून, कारवाई केली तरी अडचण आणि नाही केली तरीही अडचण अशी परिस्थिती असताना सरकार बदलले तरी राजकीय पक्षांची संधिसाधू व घातक वृत्ती कायम असल्याचे म्हटले आहे. नितांत सचोटी व तत्त्वाच्या कायम गप्पा मारणारे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कर्तव्यदक्ष मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आता अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतात की स्वत:ची कातडी वाचवतात हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)