शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

By admin | Updated: August 11, 2014 00:43 IST

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

 

नांदगाव : शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, जोडीला मलेरियाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून, सध्या किमान ५० ते ६० रुग्ण डेंग्यूग्रस्त झाल्याची माहिती आहे. गुरुकृपानगरात कल्याणी खैरनार(१४), वैष्णवी जगधने(७), मनोज सरोदे(१८), ओम गुमनार (७), रामदास केसकर(३२), साई खैरनार(४) यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील डॉ. गणेश चव्हाण, डॉ. आनंद पारख, डॉ. सुनील तुसे, डॉ. यशवंत जाधव, डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांच्याकडे उपरोल्लेखित गुरुकृपानगरातील काही अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. मात्र प्लेटलेटसची संख्या झपाट्याने कमी झाल्याने त्यांना मालेगाव व इतरत्र हलविण्यात आले आहे. डॉ. बोरसे यांनी हिसवळच्या नयना देशमुख व गुरुकृपानगरातील तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने डेंग्यू चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले असून, मंगळवार(दि.१२) पर्यंत त्याचे अहवाल प्राप्त होतील.तालुक्यातील नांदूरचे दत्तात्रय मोरे(२२), कोंढारची सुलेखा नाईकवाडे(३५), हिसवळ बुद्रूकची गौरी साळुंके(५) हे डेंग्यू संशयित आहेत. कासारी, जळगाव बुद्रूक, हिसवळ, मूळडोंगरी येथील रुग्ण मलेरिया व डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यूबाधित ओळखण्यासाठी आयजीजी, आयजीएम व एनएसएक या चाचण्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. आयजीजी चाचणी पॉझिटिव्ह असली की, लागण एका आठवड्यातली असते. आयजीएम चाचणी पॉझिटिव्ह आली की, लागण दोन आठवड्यांपूर्वी झाली असे सामान्यत डॉक्टर्स गृहीत धरतात. मात्र शासकीय यंत्रणा पुणे येथून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे असे मानत नाही.यात हिमोग्लोबीन, प्लेटलेटस व पांढऱ्यापेशींच्या संख्येचे मापन आवश्यक असते. उपचारासाठी येणारा खर्च अनेकदा अर्धा लक्ष रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर जातो.नगरपालिका, पंचायत समिती या संस्थांनी तातडीने धुरळणी व फवारणी हाती घ्यायला हवी. तसेच साफसफाईची मोहीम राबवून जनतेला काळजी घेण्याविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लागणीचे स्वरूप साथीमध्ये रुपांतरित होऊ नये यासाठी किमान वरील खबरदारीचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.महिनाभरापूर्वी तालुक्यात जळगाव बुद्रूक येथील डेंग्यूसदृश व मलेरिया रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती.(वार्ताहर)