शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

By admin | Updated: August 11, 2014 00:43 IST

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

 

नांदगाव : शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, जोडीला मलेरियाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून, सध्या किमान ५० ते ६० रुग्ण डेंग्यूग्रस्त झाल्याची माहिती आहे. गुरुकृपानगरात कल्याणी खैरनार(१४), वैष्णवी जगधने(७), मनोज सरोदे(१८), ओम गुमनार (७), रामदास केसकर(३२), साई खैरनार(४) यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील डॉ. गणेश चव्हाण, डॉ. आनंद पारख, डॉ. सुनील तुसे, डॉ. यशवंत जाधव, डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांच्याकडे उपरोल्लेखित गुरुकृपानगरातील काही अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. मात्र प्लेटलेटसची संख्या झपाट्याने कमी झाल्याने त्यांना मालेगाव व इतरत्र हलविण्यात आले आहे. डॉ. बोरसे यांनी हिसवळच्या नयना देशमुख व गुरुकृपानगरातील तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने डेंग्यू चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले असून, मंगळवार(दि.१२) पर्यंत त्याचे अहवाल प्राप्त होतील.तालुक्यातील नांदूरचे दत्तात्रय मोरे(२२), कोंढारची सुलेखा नाईकवाडे(३५), हिसवळ बुद्रूकची गौरी साळुंके(५) हे डेंग्यू संशयित आहेत. कासारी, जळगाव बुद्रूक, हिसवळ, मूळडोंगरी येथील रुग्ण मलेरिया व डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यूबाधित ओळखण्यासाठी आयजीजी, आयजीएम व एनएसएक या चाचण्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. आयजीजी चाचणी पॉझिटिव्ह असली की, लागण एका आठवड्यातली असते. आयजीएम चाचणी पॉझिटिव्ह आली की, लागण दोन आठवड्यांपूर्वी झाली असे सामान्यत डॉक्टर्स गृहीत धरतात. मात्र शासकीय यंत्रणा पुणे येथून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे असे मानत नाही.यात हिमोग्लोबीन, प्लेटलेटस व पांढऱ्यापेशींच्या संख्येचे मापन आवश्यक असते. उपचारासाठी येणारा खर्च अनेकदा अर्धा लक्ष रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर जातो.नगरपालिका, पंचायत समिती या संस्थांनी तातडीने धुरळणी व फवारणी हाती घ्यायला हवी. तसेच साफसफाईची मोहीम राबवून जनतेला काळजी घेण्याविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लागणीचे स्वरूप साथीमध्ये रुपांतरित होऊ नये यासाठी किमान वरील खबरदारीचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.महिनाभरापूर्वी तालुक्यात जळगाव बुद्रूक येथील डेंग्यूसदृश व मलेरिया रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती.(वार्ताहर)