शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

By admin | Updated: August 11, 2014 00:43 IST

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

 

नांदगाव : शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, जोडीला मलेरियाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून, सध्या किमान ५० ते ६० रुग्ण डेंग्यूग्रस्त झाल्याची माहिती आहे. गुरुकृपानगरात कल्याणी खैरनार(१४), वैष्णवी जगधने(७), मनोज सरोदे(१८), ओम गुमनार (७), रामदास केसकर(३२), साई खैरनार(४) यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील डॉ. गणेश चव्हाण, डॉ. आनंद पारख, डॉ. सुनील तुसे, डॉ. यशवंत जाधव, डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांच्याकडे उपरोल्लेखित गुरुकृपानगरातील काही अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. मात्र प्लेटलेटसची संख्या झपाट्याने कमी झाल्याने त्यांना मालेगाव व इतरत्र हलविण्यात आले आहे. डॉ. बोरसे यांनी हिसवळच्या नयना देशमुख व गुरुकृपानगरातील तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने डेंग्यू चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले असून, मंगळवार(दि.१२) पर्यंत त्याचे अहवाल प्राप्त होतील.तालुक्यातील नांदूरचे दत्तात्रय मोरे(२२), कोंढारची सुलेखा नाईकवाडे(३५), हिसवळ बुद्रूकची गौरी साळुंके(५) हे डेंग्यू संशयित आहेत. कासारी, जळगाव बुद्रूक, हिसवळ, मूळडोंगरी येथील रुग्ण मलेरिया व डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यूबाधित ओळखण्यासाठी आयजीजी, आयजीएम व एनएसएक या चाचण्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. आयजीजी चाचणी पॉझिटिव्ह असली की, लागण एका आठवड्यातली असते. आयजीएम चाचणी पॉझिटिव्ह आली की, लागण दोन आठवड्यांपूर्वी झाली असे सामान्यत डॉक्टर्स गृहीत धरतात. मात्र शासकीय यंत्रणा पुणे येथून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे असे मानत नाही.यात हिमोग्लोबीन, प्लेटलेटस व पांढऱ्यापेशींच्या संख्येचे मापन आवश्यक असते. उपचारासाठी येणारा खर्च अनेकदा अर्धा लक्ष रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर जातो.नगरपालिका, पंचायत समिती या संस्थांनी तातडीने धुरळणी व फवारणी हाती घ्यायला हवी. तसेच साफसफाईची मोहीम राबवून जनतेला काळजी घेण्याविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लागणीचे स्वरूप साथीमध्ये रुपांतरित होऊ नये यासाठी किमान वरील खबरदारीचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.महिनाभरापूर्वी तालुक्यात जळगाव बुद्रूक येथील डेंग्यूसदृश व मलेरिया रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती.(वार्ताहर)