शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

By admin | Updated: June 29, 2015 01:35 IST

गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

नाशिक : आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच चरणात पावसाने दमदार हजेरी लावून आता उघडीप घेतली असली तरी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला असून, सिंहस्थ कुंभमेळ्यात लागणाऱ्या पाणीप्रश्नी चिंता वाहणाऱ्या जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नाशिक शहर व परिसरात आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने दमदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस कमी झाला असला तरी छोट्या नद्या-नाले भरभरून वाहिल्याने गंगापूर धरणात दि. २६ जूनअखेर २३६७ द.ल.घ.फू. म्हणजे ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. आठ दिवसांपूर्वी गंगापूर धरणात २५ टके इतका पाणीसाठा होता. गंगापूर धरणात मागील वर्षी दि. २६ जून अखेर २२१९ दलघफू म्हणजे ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरणातील पाणीसाठ्याने पहिल्याच पावसात टक्केवारीची चाळीशी ओलांडल्याने नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. दीड महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून, पहिली पर्वणी २९ आॅगस्टला आहे. शासनाने गंगापूर धरणातील काही पाणीसाठा खास सिंहस्थातील तीनही पर्वण्यांसाठी राखीव ठेवला आहे; परंतु आता पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्वणीकाळात सहज पाणी उपलब्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता दूर झाली आहे. दारणा धरण तर निम्मे भरले असून, ३५५२ दलघफू म्हणजे ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी दारणा धरणात २६ जूनअखेर अवघा ४७७ दलघफू म्हणजे ७ टक्के पाणीसाठा होता. दारणाचे पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आल्याने सदर पाणीसाठा कमी झाला होता. आता दारणातही पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय कश्यपी धरणात यंदा ४०७ दलघफू म्हणजे २२ टक्के पाणीसाठा झाला आहे तर गौतमी गोदावरी धरणातही १४५ दलघफू म्हणजे ८ टक्के इतका पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)