शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

सिग्नलची डावी वळणे नावालाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:20 IST

सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात. शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, आपत्कालीन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरूपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरुवात होते. कुठे ५५, तर कुठे ६५, कुठे ८५, तर कुठे ९२ सेकंदांपर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतूक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकरशहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाºया वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबकरोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबक नाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील, यादृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.वाहतूक नियंत्रण शाखा उदासीनवाहतूक शाखेकडून यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना अथवा नागरिकांचे प्रबोधन केले जात नसल्यामुळे वाहनचालक थेट डाव्या वळणावरच वाहने आणून उभी करतात. यामुळे डावी वळणे जोपर्यंत सिग्नल खुला होत नाही तोपर्यंत बंद होतात. परिणामी सिग्नलवर थांबलेल्या वाहनांपैकी ज्यांना डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे आहे त्यांनाही थांबून रहावे लागते आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. तसेच सिग्नलवरील मर्यादित वेळेत जेवढी वाहने निघून जायला हवी तेवढी जात नाही तोच पुन्हा सिग्नल ‘लाल’ होतो. एकूणच डाव्या वळणांचा श्वास गुदमरल्यामुळे सिग्नलचे ‘टाइम मॅनेजमेंट’ही धोक्यात आले आहे.नव्या सिग्नलवरही दाखवावे गांभीर्यदिवसेंदिवस शहराची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणाºया वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख नऊ चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अशा चौकांची पाहणीदेखील केली गेली आहे. या चौकांमध्येदेखील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करताना डाव्या वळणांच्या ‘सुरक्षितते’बाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा या सिग्नलवरही ‘देखावा’ पहावयास मिळेल, असे नाशिककरांचे म्हणणे आहे.