शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलची डावी वळणे नावालाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:20 IST

सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात. शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, आपत्कालीन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरूपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरुवात होते. कुठे ५५, तर कुठे ६५, कुठे ८५, तर कुठे ९२ सेकंदांपर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतूक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकरशहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाºया वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबकरोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबक नाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील, यादृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.वाहतूक नियंत्रण शाखा उदासीनवाहतूक शाखेकडून यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना अथवा नागरिकांचे प्रबोधन केले जात नसल्यामुळे वाहनचालक थेट डाव्या वळणावरच वाहने आणून उभी करतात. यामुळे डावी वळणे जोपर्यंत सिग्नल खुला होत नाही तोपर्यंत बंद होतात. परिणामी सिग्नलवर थांबलेल्या वाहनांपैकी ज्यांना डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे आहे त्यांनाही थांबून रहावे लागते आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. तसेच सिग्नलवरील मर्यादित वेळेत जेवढी वाहने निघून जायला हवी तेवढी जात नाही तोच पुन्हा सिग्नल ‘लाल’ होतो. एकूणच डाव्या वळणांचा श्वास गुदमरल्यामुळे सिग्नलचे ‘टाइम मॅनेजमेंट’ही धोक्यात आले आहे.नव्या सिग्नलवरही दाखवावे गांभीर्यदिवसेंदिवस शहराची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणाºया वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख नऊ चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अशा चौकांची पाहणीदेखील केली गेली आहे. या चौकांमध्येदेखील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करताना डाव्या वळणांच्या ‘सुरक्षितते’बाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा या सिग्नलवरही ‘देखावा’ पहावयास मिळेल, असे नाशिककरांचे म्हणणे आहे.