शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

शुभमंगल आता सावधान!

By admin | Updated: November 15, 2016 02:02 IST

नवा कायदा : विवाह मंडळे अडकणार नियमांच्या बंधनात

संजय पाठक नाशिकविवाह नोंदणी नागरिकांना बंधनकारक असली तरी आता त्याही पुढे जाऊन विविध विवाह मंडळांनाच कायद्याच्या ‘बंधना’त अडकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह नोंदणी करणाऱ्या मंडळांना नियम अटींचे पालन करावे लागणार आहेच, परंतु विवाह नोंदणीची जबाबदारीदेखील पार पाडावी लागणार आहे. अशा प्रकारच्या नोंदणीत अटी-शर्तीचा भंग केल्यास सहा महिने कारावास भोगावा लागेल.अर्थात, ज्या महापालिका क्षेत्रात या विवाह संस्था आहेत, त्यांना यानिमित्ताने नियमांच्या जाळ्यात अडकविले जाणार असले तरी आॅनलाइन विवाह जुळविणाऱ्या अनेक संस्था असून, त्यांची नोंदणी कशी होणार हा मात्र प्रश्नच आहे. सध्या विवाह जुळविणे हे सामाजिक कार्य न राहता त्याला व्यवसायाचे स्वरूप आले असून, हजार रुपयांचे शुल्क इच्छुक उपवर-वधूच्या कुटुंबीयांकडून वसूल केले जातात. व्यावसायिक मॅरेज ब्युरोंबरोबरच ज्ञाती संस्थांचीही विवाह मंडळे आहेत. तेही विवाहांसाठी मेळावे घेऊन विवाह लावून देत असतात. परंतु आजमितीला त्यासाठी स्वतंत्र नोंदणी नव्हती; मात्र आता शासनाने या सर्व मंडळांना नोंदणीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन हजार रुपयांचे शुल्क भरून प्रत्येक विवाह मंडळाला महापालिका किंवा विवाह नोंदणी निबंधकांकडे अर्ज भरून मान्यता प्रमाणपत्र मिळावावे लागणार आहे. अशाप्रकारच्या नोंदणीसाठी दोन हजार रुपये खर्च असून विवाह मंडळ किंवा संस्थेने दिलेल्या माहितीची पडताळणी करून हे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे नोंदणीप्रमाणपत्राचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. याशिवाय नोंदणीनंतर कायद्यातील सर्व अटी-शर्तींचे पालन करावे लागणार असून, तसे न केल्यास संबंधित व्यवसायिकास वा संस्थाचालकास नोटीस बजावून नोंदणीपत्र रद्द करण्यात येणार आहे.