शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़

By admin | Updated: September 11, 2014 00:17 IST

श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़

  प्रतिनिधी  नाशिक, दि. १० - सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशात शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० डेसीबलपेक्षा जास्त आणि रात्री ४० डेसीबलपेक्षा जास्त, रहिवासी परिसरात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा जास्त व रात्री ४५ डेसिबलच्या पुढे वातावरणातील ध्वनींची पातळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे़ तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे़ मात्र न्यायालयाचा हा आदेश व ध्वनिप्रदूषणाविरोधात गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या प्रबोधनात्मक चळवळीकडे कानाडोळा करून नाशिकमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़मंडळांचा दिखावूपणाकडे कल़़प्रचंड आवाजाने भिंत कोसळून भाविकांचा मृत्यू ही भयानक घटना आहे. आवाजाची मर्यादा आपण ओलांडून कोणासाठी हे सर्व करतोय याचे भान सुटले असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. भक्तीभाव आणि समाजासाठी भरीव कार्य करण्याचे मुख्य उद्दीष्ट असणे गरजेचे असताना केवळ दिखावूपणा करण्याकडे वाढलेला कल पाहून असे उत्सव नसलेले बरे अशीच भावना मनात दाटून येते. कुणासाठी आणि कशासाठी हे जर सांगण्याची वेळ आली तर अज्ञानाची कमाल आहे. त्यापेक्षा आपण हा उत्सव कसा साजरा करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला आणि आपल्या गल्लीतील कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे. - विजय जानोरकर, म्हसरूळ, नाशिक़प्रत्येकाने विचार करायला हवा़़़मोठा आवाज म्हणजे आनंद हि अंधश्रधाच नाही का ? कोणत्या पोथीत असे लिहिले आहे? अरे ! वाचवा रे हिंदू धर्म, अशा वेड्या लोकांपासून, जे स्वत:ला, धर्म रक्षक समजतात! खरे तर हे लोक धर्म राक्षस आहेत. डॉल्बीचा आवाजावर कायद्याने नियंत्रण का असत नाही? डॉल्बी उत्पादन, विक्र ी आणि वापर यावर कडक बंधने आणायला हवे़ आपण नक्की कुणासाठी आणि कशासाठी हा उत्सव करतो या प्रश्नाचा प्रत्येकाने विचार करायला हवा?- सोमनाथ खैरनार, जेलरोड, नाशिक रोड़नागरिकांची मानसिकता नाही़़़डीजेमुळे त्रासच अधिक होतो, विशेषत: हृदयरोग असणाऱ्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागते़ त्यामुळे डीजेच्या वापरावर त्वरित बंदी आणून त्याची कडक अंमलबजावणी करायला व्हावी. साताऱ्यासारख्या आपण अजून किती जणांच्या आरोग्याला धोका होण्याची वाट बघणार आहोत? सर्वोच्च न्यायालयाने सर्वच उत्सवांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे खूप महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने नागरिकांमध्ये शिस्तीची खूप कमतरता आहे. त्यामुळे कदाचित आपण मागे आहोत. - सुजीत वडजे, म्हसरूळ, नाशिक़नवीन नियमावलीची आवश्यकता़़़सातऱ्यातील घटना ही नक्की डिजेच्या आवाजामुळे घडली की आणखी कुठल्या कारणामुळे हे तपासाअंती समोर येईल़ तसेच डिजेच्या प्रचंड आवाजामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात हे मात्र खरे आहे़ साताऱ्याच्या घटनेवरून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी डिजेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे़- विनायक शिंदे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडऴ