शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

श्री त्र्यंबकेश्वर चरणी तीन लाख भाविक नतमस्तक यंत्रणेची धावपळ : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्र्यंबकला तळ ; सायंकाळनंतर वाढली गर्दी

By admin | Updated: August 12, 2014 01:09 IST

श्री त्र्यंबकेश्वर चरणी तीन लाख भाविक नतमस्तक यंत्रणेची धावपळ : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्र्यंबकला तळ ; सायंकाळनंतर वाढली गर्दी

त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पोलीस, नगरपालिका, वीज वितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालय, सेवाभावी संस्था आणि खासगी वैद्यकीय यांनी सुविधा दिल्या.तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे यंत्रणांना डोकेदुखी ठरते. रात्रभर अधिकारी वर्ग त्र्यंबकेश्वरला तळ ठोकून होता. रविवारी आदल्या दिवशी नेहमी गर्दीचा उच्चांक मोडला जातो. यावर्षी सायंकाळी ४ वाजेपर्यंत गर्दी नव्हती. त्यानंतर मात्र गर्दीत वाढ झाली. एस.टी.च्या दुपारपर्यंत ३०७ फेऱ्या झाल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वत: विभाग नियंत्रक यामिनी जोशी त्र्यंबकला तळ ठोकून आहेत. परिवहन महामंडळाने ४०० गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे उद्यापर्यंत निश्चित आकडा भाविकांचा मिळू शकेल. पोलिसांनी काल खंबाळे येथे केलेला बंदोबस्ताचा अतिरेक वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. स्वत: पोलीस अधीक्षक ग्रामीण संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, त्र्यंबकचे पोलीस अधिकारी आदिंनी व्यवस्थित नियोजन केले.त्र्यंबकचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आदि तळ ठोकून होते, तर नगराध्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, सर्व कर्मचारी दोन दिवस सुटी असूनही सेवा बजावत होते.दरम्यान, आज दुपारी २.३० वाजता देवाची पालखी निघाली आणि कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. भगवान त्र्यंबकराजाच्या पालखीबरोबर हजारो लोक सामील झाले होते. तिसरा श्रावण सोमवार म्हणजे भाविकांना जणू दर्शनाची पर्वणी असते. दुकानदार, टपरीवाले, छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना थोडाफार तोटा मिळाला. पावसाचे सातत्य मात्र टिकून असताना परिक्रमा रस्ता सीमेंट काँक्रिटचा असल्यामुळे काहींना सुखदायी वाटला. तर काहींना त्रास जाणवल्याचे दिसून आलेत. थंडी, ताप, गुडघे, पाय आदिंचा त्रास झालेल्यांनी आज त्र्यंबक ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेतले, तर काही रुग्ण थंडी, ताप तसेच दमा विकार असलेले दाखल झालेले आहेत. ते उपचार घेत असून, यात नगर, जालना, अकोला आदि गावांचे रुग्ण आहेत. डॉ. अशोक मते, डॉ. भागवत लोंढे, डॉ. विठ्ठल काळे व अन्य १० ते १५ वैद्यकीय अधिकारी रुग्णांवर उपचार करीत असून, दुसरीकडे रेड स्वस्तिक या सेवाभावी संस्थेचे फिरते रुग्णालय पुरेशा औषध खजिन्यासह व सुमारे १५ डॉक्टरांचे पथक परिक्रमा रस्त्यावर पाय खरचटलेले, दम्याचा अटॅक आलेले, चक्कर आलेले रुग्ण औषधांचा लाभ घेत होते. पथकप्रमुख राजेश सोनवणे व्यवस्था पाहत होते. गावात ठिकठिकाणी पेढ्यांचे, खजुराचे, चहा, दूध, फळे आदिंच्या हातगाड्या ठिकठिकाणी लागल्याने त्यांचा चांगला खप झाला. पेढे, खिचडी, साबुदाणा वडे यांनाही चांगली मागणी होती. त्यातही या सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले असूनही खप बऱ्यापैकी झालेला दिसून आला. काही सेवाभावी संस्थांनी खिचडी वाटप केले. त्र्यंबक पालिकेतर्फेही नगराध्यक्षांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आली. (वार्ताहर)