शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
3
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
4
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
5
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
6
मोहम्मद सिराजने लावला पिंपल पॅच? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, असं होतं त्वचेचं संरक्षण
7
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
8
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
9
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
10
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
11
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
12
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
13
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
14
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
15
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
16
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
17
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
18
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
19
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
20
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!

आताच लसींचा तुटवडा; मे मध्ये उडणार झुंबड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:15 IST

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे नाशिकला लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्यादेखील नाशिक जिल्ह्यात केवळ ५ दिवस पुरेल इतका लसींचा ...

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे नाशिकला लसींचा तुटवडा जाणवत आहे. सध्यादेखील नाशिक जिल्ह्यात केवळ ५ दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, ३० एप्रिलला हा साठा संपल्यानंतर पुन्हा लस केव्हा मिळणार त्याची प्रशासनालादेखील माहिती नाही. अशा परिस्थितीत १ मेपासून जेव्हा १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा नियम अमलात येईल त्यावेळी तर लसीकरण केंद्रांवर प्रचंड झुंबड उडणार असून, सध्या भासणाऱ्या तुटवड्यापेक्षाही अधिक दर दोन दिवसांत ठणठणाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा सातत्याने चार-पाच दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लस कितपत उपलब्ध होईल, त्याची माहितीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध नसते. जिल्ह्यात प्रारंभी केवळ ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. तरीदेखील सातत्याने काही केंद्रांवर लस आहे, काही केंद्रांवर नाही, कुठल्या केंद्रांवर लस सकाळी आहे, दुपारी संपली, काही केंद्रांवर दिवसभरच नाही असा अनुभव नागरिकांना गत तीन महिने सातत्याने घ्यावा लागत आहे. नाशिकमध्ये दिवसभरात उपलब्ध साठ्यातून दिवसाला १६ ते २० हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे.

इन्फो

लसीकरणासाठी रांगा

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाकडे पाहून घाबरलेल्या नागरिकांनी आता लसीकरणासाठी रांगा लावल्याचे दृश्य सर्वच लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहे. नागरिक नोंद केल्यानंतर सकाळी लवकरच रांगेत उभे राहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य देत आहेत, तर ज्यांचा लसीचा पहिला डोस एक महिन्यापूर्वीच झाला आहे, असे नागरिकदेखील दुसऱ्या लसीसाठी घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच १ मेपासून प्रचंड मोठ्या रांगा आणि झुंबड उडणार असल्याची लक्षणे आताच दिसून येत आहेत.

अवघे ४ टक्के लक्ष्य पूर्ण

प्रारंभी केवळ आरोग्य कर्मचारी आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जात होती. त्यावेळी लसीबाबत साशंकता असल्याने लसीसाठी नागरिकांना बोलावण्यास कष्ट पडत होते. मात्र, शासन आदेशानुसार ४५ वयाच्या वरील सर्व नागरिकांसाठी मनपाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे; परंतु अनेक नागरिक लस घेण्यासाठी सकाळी सात वाजेपासून रांगा लावत असल्याने ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे. लसीकरणाची वेळ ही सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत आहे; परंतु असे असतानाही नागरिक मात्र लस लवकर मिळावी यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रात सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निम्मे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक असल्याचेही निदर्शनात येत आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे आताच कठीण जात आहे. आतापर्यंतच्या ३ महिन्यांत लस देण्याची जी वयोमर्यादा देण्यात आली, त्यातील एकूण लोकसंख्येपैकी अवघे ४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

इन्फो

लसीकरणानंतरही हवी आरोग्यदायी जीवनशैली

कोविड लसीकरणासाठी रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम असण्‍यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणेदेखील आवश्यक आहे. एका संशोधनानुसार दररोज पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्‍ये पुरेशी झोप घेणाऱ्यांच्‍या तुलनेत लसीकरणाचा अर्धा प्रभाव दिसून आला. हेच समीकरण कोविड लसीकरणाबाबतही लागू पडू शकते. त्यामुळेच कोविड लसीकरणानंतरही नागरिकांनी सक्रिय राहणे, व्‍यायाम करणे, तसेच पुरेशी झोप घेणे हाच लसीकरणाचे चांगले परिणाम कायम ठेवण्याचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शारीरिकदृष्‍ट्या तंदुरुस्‍त आणि आरोग्‍यदायी जीवनशैली राखल्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारच्‍या गंभीर आजारांचा धोका कमी होण्‍यामध्‍ये मदत होते, हे तत्त्व इथेही लागू पडते.

कोट.

मनपाच्या केंद्रांमध्ये दररोज किमान तीनशे नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे; परंतु अनेक नागरिक हे सकाळपासूनच रांगा लावण्यासाठी गर्दी करीत आहेत; परंतु आरोग्य कर्मचारीदेखील सामान्य माणसे असून, त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने याबाबत नागरिकांनीदेखील संयम ठेवणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी गर्दी न करता अंतर राखणे हे नागरिकांच्याच हिताचे आहे.

डॉ. अजिता साळुंके, मनपा वैद्यकीय अधिकारी

(ही डमी आहे.)