शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

युरिया खतांचा तुटवडा, पिकांवर अळींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे ...

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या युरिया खताबाबत ही बाब उपस्थित होते. वितरकांनाच मागणीप्रमाणे खत उपलब्ध होत नसल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. यातूनच तक्रारींचा पाढा वाचला जातो अन् विक्रेते आणि त्या पाठोपाठ कृषी विभागही राजकीय पक्ष संघटनाकडून लक्ष्य होतो.

सध्या खरीप हंगाम सुरू असून, या हंगामातही तालुक्यातील युरिया खताबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, प्रहार संघटनेने केलेले अर्धनग्न ठिय्या आंदोलनाने प्रश्‍न राज्यभर पोहोचला आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने येवल्यात थोड जरी खुट्ट झाले की त्याची चर्चा रंगते. आंदोलनाने यंत्रणा सक्रिय झाली आणि युरिया उपलब्धतेबाबत खुद्द पालकमंत्री आणि कृषी विभागाकडून प्रयत्न केले गेले. यातून तालुक्यात अनेक वितरकांकडे खत उपलब्ध असल्याचेही दिसून आले. काही भागातील वितरकांनी तर मागणी नसल्याचेही सांगितले.

तालुक्यातील पाऊसमानातील बदलाने पीक पद्धतीतही बदल होत चालले आहेत. सर्वत्र सारखा पाऊस होत नसल्याने ज्या भागात पाऊस होतो त्या भागात पीक पेरण्या होतात, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या जातात. यात दुबार पेरणीचेही संकट येते. कालमानात होणाऱ्या बदलाने बाजारातील खत, औषध आणि बियाणे बाजारातील मागणीवरही बदल दिसून येतो.

यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या; परंतु वाढत्या तापमानाने बहुतांश बियाणे उगवले नाही. त्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर मृगाचा पाऊस उशिरा सुरू झाला. काही भागात पाऊस गायब, तर काही भागात समाधानकारक पाऊस नसल्याने यावर्षी काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. यातून सोयाबीन उगवले नाही तर मका वा इतर पिके शेतकऱ्यांनी घेतले. दरवर्षी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभाग नियोजन करीत असते, परंतु बदलत्या पाऊस पद्धतीने त्यांचेही नियोजन कोलमडत असल्याचे दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून मक्यावर लष्करी अळी, सोयाबीनवर उंटअळींचे आक्रमण होत आहे. यावर्षीही या पिकांवर या अळींचे आक्रमण झाले आहे, तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत टोमॅटो, भेंडी, वांगे, पालक, आदी भाजीपाला पिके घेणे पसंत केले आहे. या भाजीपाला पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

इन्फो

७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

येवला तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, आदी पिकांची पेरणी होते. यंदा पाऊस तीन टप्प्यांत झाल्याने पेरण्याही तीन टप्प्यात झाल्या आहेत. ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, ६ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ३२१ हेक्टर क्षेत्रावर तूर, १२४ हेक्टर क्षेत्रावर उडीद, तर १६ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य असे एकूण ७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

सध्या पीक परिस्थिती चांगली असून, शेतीची आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. जूनअखेर २ हजार ६५० मेट्रिक टन, तर जुलै महिन्यात १ हजार ९८० मेट्रिक टन असा एकूण ४ हजार ६३० मेट्रिक टन इतका युरिया खत तालुक्यात टप्प्याटप्प्याने पुरवठा झाला आहे. सध्या तालुक्यात २६२ मेट्रिक टन खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे, तर खरीप हंगामासाठी ६ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६९३९.६८ लाख पीक कर्ज वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.