शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

युरिया खतांचा तुटवडा, पिकांवर अळींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे ...

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या युरिया खताबाबत ही बाब उपस्थित होते. वितरकांनाच मागणीप्रमाणे खत उपलब्ध होत नसल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. यातूनच तक्रारींचा पाढा वाचला जातो अन् विक्रेते आणि त्या पाठोपाठ कृषी विभागही राजकीय पक्ष संघटनाकडून लक्ष्य होतो.

सध्या खरीप हंगाम सुरू असून, या हंगामातही तालुक्यातील युरिया खताबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, प्रहार संघटनेने केलेले अर्धनग्न ठिय्या आंदोलनाने प्रश्‍न राज्यभर पोहोचला आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने येवल्यात थोड जरी खुट्ट झाले की त्याची चर्चा रंगते. आंदोलनाने यंत्रणा सक्रिय झाली आणि युरिया उपलब्धतेबाबत खुद्द पालकमंत्री आणि कृषी विभागाकडून प्रयत्न केले गेले. यातून तालुक्यात अनेक वितरकांकडे खत उपलब्ध असल्याचेही दिसून आले. काही भागातील वितरकांनी तर मागणी नसल्याचेही सांगितले.

तालुक्यातील पाऊसमानातील बदलाने पीक पद्धतीतही बदल होत चालले आहेत. सर्वत्र सारखा पाऊस होत नसल्याने ज्या भागात पाऊस होतो त्या भागात पीक पेरण्या होतात, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या जातात. यात दुबार पेरणीचेही संकट येते. कालमानात होणाऱ्या बदलाने बाजारातील खत, औषध आणि बियाणे बाजारातील मागणीवरही बदल दिसून येतो.

यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या; परंतु वाढत्या तापमानाने बहुतांश बियाणे उगवले नाही. त्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर मृगाचा पाऊस उशिरा सुरू झाला. काही भागात पाऊस गायब, तर काही भागात समाधानकारक पाऊस नसल्याने यावर्षी काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. यातून सोयाबीन उगवले नाही तर मका वा इतर पिके शेतकऱ्यांनी घेतले. दरवर्षी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभाग नियोजन करीत असते, परंतु बदलत्या पाऊस पद्धतीने त्यांचेही नियोजन कोलमडत असल्याचे दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून मक्यावर लष्करी अळी, सोयाबीनवर उंटअळींचे आक्रमण होत आहे. यावर्षीही या पिकांवर या अळींचे आक्रमण झाले आहे, तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत टोमॅटो, भेंडी, वांगे, पालक, आदी भाजीपाला पिके घेणे पसंत केले आहे. या भाजीपाला पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

इन्फो

७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

येवला तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, आदी पिकांची पेरणी होते. यंदा पाऊस तीन टप्प्यांत झाल्याने पेरण्याही तीन टप्प्यात झाल्या आहेत. ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, ६ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ३२१ हेक्टर क्षेत्रावर तूर, १२४ हेक्टर क्षेत्रावर उडीद, तर १६ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य असे एकूण ७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

सध्या पीक परिस्थिती चांगली असून, शेतीची आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. जूनअखेर २ हजार ६५० मेट्रिक टन, तर जुलै महिन्यात १ हजार ९८० मेट्रिक टन असा एकूण ४ हजार ६३० मेट्रिक टन इतका युरिया खत तालुक्यात टप्प्याटप्प्याने पुरवठा झाला आहे. सध्या तालुक्यात २६२ मेट्रिक टन खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे, तर खरीप हंगामासाठी ६ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६९३९.६८ लाख पीक कर्ज वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.