शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

युरिया खतांचा तुटवडा, पिकांवर अळींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे ...

योगेंद्र वाघ, येवला : शेती हंगाम सुरू झाला की, खत टंचाई, काळाबाजार आणि लिंकिंग याबाबतच्या तक्रारी सुरू होतात. सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या युरिया खताबाबत ही बाब उपस्थित होते. वितरकांनाच मागणीप्रमाणे खत उपलब्ध होत नसल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. यातूनच तक्रारींचा पाढा वाचला जातो अन् विक्रेते आणि त्या पाठोपाठ कृषी विभागही राजकीय पक्ष संघटनाकडून लक्ष्य होतो.

सध्या खरीप हंगाम सुरू असून, या हंगामातही तालुक्यातील युरिया खताबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, प्रहार संघटनेने केलेले अर्धनग्न ठिय्या आंदोलनाने प्रश्‍न राज्यभर पोहोचला आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने येवल्यात थोड जरी खुट्ट झाले की त्याची चर्चा रंगते. आंदोलनाने यंत्रणा सक्रिय झाली आणि युरिया उपलब्धतेबाबत खुद्द पालकमंत्री आणि कृषी विभागाकडून प्रयत्न केले गेले. यातून तालुक्यात अनेक वितरकांकडे खत उपलब्ध असल्याचेही दिसून आले. काही भागातील वितरकांनी तर मागणी नसल्याचेही सांगितले.

तालुक्यातील पाऊसमानातील बदलाने पीक पद्धतीतही बदल होत चालले आहेत. सर्वत्र सारखा पाऊस होत नसल्याने ज्या भागात पाऊस होतो त्या भागात पीक पेरण्या होतात, ज्या भागात पाऊस नाही त्या भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या जातात. यात दुबार पेरणीचेही संकट येते. कालमानात होणाऱ्या बदलाने बाजारातील खत, औषध आणि बियाणे बाजारातील मागणीवरही बदल दिसून येतो.

यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या; परंतु वाढत्या तापमानाने बहुतांश बियाणे उगवले नाही. त्यानंतर रोहिणी नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर मृगाचा पाऊस उशिरा सुरू झाला. काही भागात पाऊस गायब, तर काही भागात समाधानकारक पाऊस नसल्याने यावर्षी काही ठिकाणी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत. यातून सोयाबीन उगवले नाही तर मका वा इतर पिके शेतकऱ्यांनी घेतले. दरवर्षी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभाग नियोजन करीत असते, परंतु बदलत्या पाऊस पद्धतीने त्यांचेही नियोजन कोलमडत असल्याचे दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून मक्यावर लष्करी अळी, सोयाबीनवर उंटअळींचे आक्रमण होत आहे. यावर्षीही या पिकांवर या अळींचे आक्रमण झाले आहे, तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करीत टोमॅटो, भेंडी, वांगे, पालक, आदी भाजीपाला पिके घेणे पसंत केले आहे. या भाजीपाला पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

इन्फो

७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

येवला तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ७९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, आदी पिकांची पेरणी होते. यंदा पाऊस तीन टप्प्यांत झाल्याने पेरण्याही तीन टप्प्यात झाल्या आहेत. ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, ६ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ३२१ हेक्टर क्षेत्रावर तूर, १२४ हेक्टर क्षेत्रावर उडीद, तर १६ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य असे एकूण ७२ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

सध्या पीक परिस्थिती चांगली असून, शेतीची आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. जूनअखेर २ हजार ६५० मेट्रिक टन, तर जुलै महिन्यात १ हजार ९८० मेट्रिक टन असा एकूण ४ हजार ६३० मेट्रिक टन इतका युरिया खत तालुक्यात टप्प्याटप्प्याने पुरवठा झाला आहे. सध्या तालुक्यात २६२ मेट्रिक टन खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे, तर खरीप हंगामासाठी ६ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६९३९.६८ लाख पीक कर्ज वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.