शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भारनियमनाचा शेतीला फटका

By admin | Updated: May 6, 2017 23:19 IST

वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत असून, वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठ्यात घट व कोळशाच्या टंचाईमुळे होणाऱ्या अडचणीचे कारण वितरण कंपनीने पुढे केले आहे.एकलहरे विद्युत केंद्रातून ओझर-दिंडोरी-वणी-सुरगाणा असा वीजप्रवाह दिंडोरी व सुरगाणा तालुक्यात करण्यात येतो. दिंडोरी येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत केंद्र असून, वणी ३३ केव्ही, पिंप्री ३३ केव्ही, करंजखेड ३३ केव्ही, सुरगाणा ३३ केव्ही अशा क्षमतेच्या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी व पुरवठा यात समन्वय राहिला नसल्याने नाइलाजाने ग्रामीण भागात भारनियमन वितरण कंपनीला सुरू करावे लागले़ विद्युत निर्मितीसाठी आवश्यक जलसाठा व कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत असल्याने नाइलाजाने भारनियमन करावे लागत असल्याची वितरण कंपनीची भूमिका आहे. दरम्यान, दिवसेगाणिक शेती घरगुती व्यापारी औद्योगिक वीज ग्राहकाकडून वीजजोडणीची मागणी वाढली आहे. ग्राहकांची वाढणारी संख्या व वीजनिर्मिती यांचे समन्वयात्मक गणित जुळत नसल्याने आपत्कालीन भारनियमनाचे अस्र वितरण कंपनीने बाहेर काढले आहे. वीजग्राहकाचे समाधान करता करता वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची दमछाक झाली असून, सद्यस्थिती पाहता आपत्कालीन भारनियमन शहरी भागात व ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.