शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

धक्कादायक...! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास ...

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा आणि मुलगीदेखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयांतच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.

मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतःला सावरत वडिलांना मोबाइलवर संपर्क करून ही दुःखद वार्ता कळविली.

बराच वेळ होऊनही वडील रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबीयांना फोन करून वडिलांची माहिती घेण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी रवींद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली. यावेळी एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते. यावेळी रुग्णालयातील अन्य नागरिकांनी त्यांच्याजवळ जात समजावून धीर देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत भाजपा सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकीत जाऊन घटनेची प्राथमिक माहिती दिली. सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

----इन्फो---

मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब

मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मोठा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा हादेखील रोजंदारीवर एका खासगी कारखान्यात कामाला जातो. पवार यांचे अत्यंत सामान्य गरीब कुटुंब होते. या कुटुंबाचा आधारच आता नियतीने हिरावून घेतल्याने भावंडांवर आकाश फाटले आहे.