शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

धक्कादायक...! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास ...

श्रमिकनगर येथील माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२) यांच्या पत्नी संगीता पवार (४५) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा आणि मुलगीदेखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयांतच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.

मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतःला सावरत वडिलांना मोबाइलवर संपर्क करून ही दुःखद वार्ता कळविली.

बराच वेळ होऊनही वडील रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबीयांना फोन करून वडिलांची माहिती घेण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी रवींद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली. यावेळी एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते. यावेळी रुग्णालयातील अन्य नागरिकांनी त्यांच्याजवळ जात समजावून धीर देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत भाजपा सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकीत जाऊन घटनेची प्राथमिक माहिती दिली. सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

----इन्फो---

मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब

मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मोठा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा हादेखील रोजंदारीवर एका खासगी कारखान्यात कामाला जातो. पवार यांचे अत्यंत सामान्य गरीब कुटुंब होते. या कुटुंबाचा आधारच आता नियतीने हिरावून घेतल्याने भावंडांवर आकाश फाटले आहे.