शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 19:04 IST

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकळवण : जलवाहिनीचे साहित्यही तालुक्यात उतरु देणार नाही ; मत्र्यांची घेतली शिष्टमंडळाने भेट

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.दरम्यान या योजनेला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते, सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यातील शिष्टमंडळाने भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे.या योजनेमुळे तालुक्यातील जनतेचे होणाºया नुकसानाची माहिती देऊन या प्रकल्पासाठी ज्या शेतकरी बांधवांनी जमीनी दिल्या त्यांना या प्रकल्पातील पाण्याचा अद्याप लाभ झाला नाही, त्यामुळे कळवणच्या जनतेसाठी पुनंद प्रकल्पातील पाणी प्रथम आरक्षित करा अशी मागणी शिवसेनेने करु न शिंदे यांचे लक्ष वेधले व पाणी प्रश्नांवर शिष्टमंडळाने चर्चा केली.एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात कळवण तालुक्यातील जनतेचा असलेला विरोध व तालुक्यासाठी प्रथम पाणी आरक्षित करणे आदी मागण्या संदर्भात व जनतेच्या भावना लक्षात आणुन देवू व जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यास विनंती करु अशी ग्वाही यावेळी शिष्टमंडळाला दिली.कळवण तालुक्यातून जनतेचा विरोध डावलून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याची घोषणा केल्यानंतर सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कळवण तालुक्यातून विरोध दर्शवून थेट मंत्रालयात धाव घेऊन विरोध केला आहे. कळवण तालुक्यातील जनतेचा रोष पत्करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेचे भूमिपूजन केल्याने तालुक्यात नाराजी पसरली आहे.शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुका प्रमुख अंबादास जाधव, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, डॉ दिनेश बागूल, संजय रौंदळ, किशोर पवार, डॉ. पंकज मेणे आदी सहभागी झाले होते.पुनंद धरणातून सटाणा शहरास पाणी देण्यास शिवसेनेचा व तालुकावासीयांचा विरोध नाही. मात्र पाईपलाइनने पाणी नेण्याऐवजी सुळे डाव्या कालव्याद्वारे नेण्यात यावे पाईपलाइनने पाणी नेल्यास या भागातील बागायती शेती उद्धवस्त होईल. शेतकºयांच्या भावनांचा आदर करीत ह्या योजनेसंदर्भात फेरविचार करावा.- अंबादास जाधव,शिवसेना, तालुकाप्रमुख कळवण.