शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी

By admin | Updated: December 6, 2015 00:09 IST

पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी

येवला : पालखेड डाव्या कालवाअंतर्गत शेतीसाठी आवर्तन द्यावे , कांद्याचे निर्यातमूल्य कमी करावे आदि मागण्यांसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी तहसीलदार शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. शनिवारी शिवसेनेच्या वतीने शेतीला पाणी मिळावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना बाजू मांडण्यासाठी बोलू दिले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शिवसेना जर सत्तेत आहे तर आजचे आंदोलन कोणाच्या विरोधात केले, असा सवाल करून सत्तेत राहून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या आंदोलनाचा निषेध म्हणून व शेतीसाठी पाणी मिळावे, कांद्याचे निर्यातमूल्य शून्य व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता जळगाव नेऊर येथे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर बाबा थेटे, सुदाम पडवळ , नवनाथ ठोंबरे, राजू थेटे, विकास ठोंबरे, मच्छिंद्र वारे, साहेबराव ठोंबरे, अनिल ठोंबरे, महेश शिंदे, प्रकाश शिंदे, विलास वारे, मच्छिंद्र ठोंबरे, शरद सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)