शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’

By admin | Updated: July 10, 2017 22:54 IST

याद्या मागितल्या : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती फसवी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा बॅँकेसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमुक्ती फसवी असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. त्याचाच भाग म्हणून राज्यात सर्व बॅँकांसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.द्वारका येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आवारात सोमवारी (दि. १०) शिवसेनेच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी करण्यात आली. तसेच ढोल वाजवून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ‘ढोल बजाओ’ आंदोलनात संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरी माहिती शिवसेनेला हवी आहे. सरकारने केलेली कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा बँकांसह सर्वच बँकांकडून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागण्यासाठी जाब विचारणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विलास बोरस्ते यांनी कर्जमाफीचा शासन निर्णय अद्याप प्राप्त नसून, कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर त्या देण्यात येतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा बॅँक अध्यक्षांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, चंदक्रांत लवटे, सुधाकर बडगुजर, जगन्नाथ आगळे, डी. जी. सूर्यवंशी, शिवाजी भोर, नितीन चिडे, सुदाम ढेमसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.