शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शिवसेनेलाच हवेभाजपाकडील मतदारसंघ

By admin | Updated: May 22, 2014 22:17 IST

लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवार सेनेचा आणि त्यातील मतदारसंघांवर भाजपाचा दावा कसा असू शकतो, असा प्रश्न सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे.

विधानसभेसाठी सुंदोपसुंदी : नेत्यांना प्रस्ताव पाठविणारनाशिक :लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवार सेनेचा आणि त्यातील मतदारसंघांवर भाजपाचा दावा कसा असू शकतो, असा प्रश्न सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. भाजपाने हवे असल्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगावा, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शहरातील चार विधानसभा मतदारसंघ घेण्यावरून महायुतीतच स्पर्धा वाढण्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर एक लाख ८७ हजार, तर दिंडोरीत भाजपाचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यावर दोन लाख ४७ हजार मतांनी मात केली. नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाल्याने भाजपा आणि सेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील मताधिक्य बघता पूर्व, पश्‍चिम आणि मध्य नाशिक तसेच देवळाली राखीव मतदारसंघ भाजपाला हवा आहे. तसे सूतोवाच भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केले आहे. सध्या भाजपाकडे पूर्व आणि पश्‍चिम नाशिक हे दोनच मतदारसंघ असून, उर्वरित दोन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी त्याबाबत सूतोवाच केले होते; परंतु आज त्यावर शिवसेनेने कडी करीत नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपाच्या ताब्यातील दोन मतदारसंघदेखील सेनेला मिळावे यासाठी सेनेचा आग्रह असल्याचे बोरस्ते म्हणाले. सध्या केंद्रात युतीची सत्ता आली आणि जिल्ह्यातदेखील दोन्ही जागा महायुतीला मिळाल्या असल्याने आता विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना पक्षीय स्तरावरच झाली पाहिजे. शहराध्यक्षांनी संपर्कप्रमुखामार्फत आपापल्या पक्षनेत्यांकडे मागण्या पोहचवून दोन्ही पक्षांतील नेत्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये जागांची मागणी करणे योग्य नाही. त्यामुळे युतीचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात उगाचच संभ्रम निर्माण होतो, असेही ते म्हणाले. सेनेच्या संपर्कप्रमुखांमार्फत शहरातील वाढीव जागांची मागणी केली जाईल, असे ते म्हणाले.