शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्जमाफीसाठी दसºयापर्यंत अल्टिमेटम दिला.

दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्जमाफीसाठी दसºयापर्यंत अल्टिमेटम दिला.शिवसेनेच्या शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयापासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चा काढण्यात आला. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे, भीक नको हक्क हवा, कर्जमाफीची माहिती मिळायलाच पाहिजे, बळीराजा हा देशाचा सहारा, त्याला वाचवू हाच शिवसेनेचा नारा’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या प्रारंभी शेतकºयाचे प्रतीक म्हणून तीन बैलगाड्याही ठेवण्यात आल्या होत्या व त्यावर शेतकºयांना स्वार करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयापासून निघालेला मोर्चा शिवाजीरोडने थेट मध्यवर्ती बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरधडकला. यावेळी पोलिसांनीचोख बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत हा मोर्चा आटोपला. या निवेदनात म्हटले आहे की, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे महाराष्टÑात शेतकºयांच्या दररोज आत्महत्या होत असून, ते टाळण्यासाठी शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांत अगोदर केली. त्यासाठी शेतकºयांचे मोर्चेही काढण्यात आले.यावेळी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, श्यामला दीक्षित, सत्यभामा गाडेकर, डी. जी. सूर्यवंशी, राजू लवटे, प्रवीण तिदमे, धनराज महाले यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.शेतकºयांमध्ये फसवणुकीची भावनाशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. परंतु तीन महिने उलटूनही एकाही शेतकºयाची कर्जमाफी झाली नाही. सरकार केवळ आकड्यांचा खेळ करीत असून, तारखांवर तारखा देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण होऊन असंतोष निर्माण झाला आहे. कर्जमाफी अर्जाचे क्लिष्ट नियम, निकषांमुळेही अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकºयांच्या भावनांचा विचार करून दसºयापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन छेडेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.