शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:46 IST

लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साधारणत: पदे बदलली जात नाहीत. संघटनावर त्याचा परिणाम होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पक्षांत बदलण्याचे काम अगोदर केले जाते किंवा निवडणूक निकालाच्या पश्चात केले जाते. परंतु सेनेने मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच बदल केले आहेत.पूर्वी नाशिक पूर्व विधानसभेची जबाबदारी मिलिंद घनकुटकर, पश्चिम विधानसभा मतदारसंघाची नीलेश चव्हाण यांच्याकडे, तर मध्य नाशिकची जबाबदारी हेमंत रासम यांच्याकडे होती. त्याऐवजी आता पूर्व मतदारसंघाकडे गिरीश विचारे, मध्य नाशिकमध्ये ललित शाईवाले तसेच पश्चिमची जबाबदारी प्रकाश वाणी यांच्याकडे देण्यात आली आहे. जुन्या संपर्क प्रमुखांच्या काळात मध्यमध्ये अनेक संघटनात्मक रचनांची कामे अपूर्ण होती, तर पश्चिममध्ये संपर्कप्रमुखच सत्तेची स्वप्ने बघू लागली होती असे समजते. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने बदल केले आहेत.शिवसेनेने हे बदल तातडीने झाले असले तरी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे दिसत आहेत. आमदार आणि शहराध्यक्ष असे दुहेरीपदे भुषविणाऱ्यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. संघटना आणि सत्तेची पदे एकाच व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती संघटनात्मक कामांना न्याय देऊ शकणार नाही, अशी बाजू पक्षाच्या वतीने मांडली जात होती. मात्र वेळेत हा बदल अमलात आलानाही. आता लोकसभा निकालानंतरच बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले, तर कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेरदेखील गच्छंतीतून तूर्तास बचावले आहेत. आहेर यांना हटविण्यासाठी तयारी झाली होती.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी सर्वांचे  म्हणणे ऐकले होते त्यानंतर महापालिकेतील गटनेता शाहू खैरे यांना बदलल्यानंतर आता  आहेर यांचा क्रमांक लागणार  अशी चर्चा असतानाचलोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने तूर्तास ते बचावल्याचे सांगितले जाते.पदांच्या खिरापतींचे वाटपएकीकडे शिवसेनेकडून संपर्कप्रमुखांत बदल केले जात असताना दुसरीकडे अनेक पक्षांकडून विशेषत: भाजपाकडून पदांचे खिरापतीसारखे वाटप सुरू झाले आहेत. गेली साडेचार वर्षे काहीच सत्तापद किंवा समित्या न मिळालेल्यांना संघटनात्मकपदे देण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना