शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमणध्वनीचे संभाषण मागविणार शिवाजी सहाणे : निकाल बाहेरून लिहून आणल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:26 IST

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला.

ठळक मुद्दे अर्जावर सहाणे यांनी तीन हरकती घेतल्या होत्यानिकाल देण्यासाठी सहा तासांचा कालावधी

नाशिक : शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. या काळात त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत ते मराठीतून निकाल कसे देऊ शकतात, असा संशय व्यक्त करीत निकाल बाहेरून लिहून आणल्याचा गंभीर आरोप राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाºयांच्या या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार दराडे यांच्या अर्जावर सहाणे यांनी तीन हरकती घेतल्या होत्या. त्याची सुनावणी होऊन जिल्हाधिकाºयांनी रात्री साडेअकरा वाजता निकाल जाहीर केला. त्यापार्श्वभूमीवर सहाणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाºयांच्या समक्ष घेतलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. साधारणत: ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले, मात्र निकाल देण्यासाठी सहा तासांचा कालावधी घेण्यात आला. जिल्हाधिकाºयांसमक्ष दोन्ही बाजूंच्या वकिलांनी इंग्रजीमध्ये युक्तिवाद केला. आमच्या वतीने मद्रास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दोन असे तीन निकाल पुराव्यादाखल देण्यात आले, असे असतानाही जिल्हाधिकाºयांनी अवघ्या चार पानांचा मराठी भाषेत निकाल दिला आहे. जिल्हाधिकाºयांचे मराठी भाषेविषयीचे ज्ञान पाहता त्यांनीच हा निकाल दिला असेल याबाबत संशय असून, बाहेरच्या व्यक्तींनी तो लिहून दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सहाणे यांनी केला. या निकालात आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या निवाड्याबाबत एका ओळीनेदेखील उल्लेख केला नसून, तो कुणाच्या तरी सांगण्यावरून तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी हा निकाल लिहिला असेल तर ज्या संगणकावर त्यांनी तो लिहिला त्याची हार्डडिस्क मागविण्यात येणार आहे. शिवाय सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत जिल्हाधिकाºयांशी कोणी कोणी संपर्क साधला, त्याबाबत संभाषणाचे सीडीआरदेखील मागविण्यात येणार असल्याचे सांगून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसºया दिवशीच जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाºयांनी राजकीय प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या अर्जातील एकही कॉलम रिकामा ठेवल्यास अर्ज बाद होणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांच्या या बैठकीची ध्वनिचित्रफीतही मागविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.