शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच शिवभक्तांनी घातले लोटांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच ...

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच लोटांगण घालत भोलेनाथाची आराधना केली. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली.

श्रावणमासातही मंदिर खुले न झाल्याने निराश भाविकांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच डोके टेकविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाही बंद ठेवली आहे. त्र्यंबकेश्वरला श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक जमा होत असतात. परंतु, यंदा कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने भाविकांची वर्दळ कमी दिसून आली. सोमवारी उत्तररात्री पेगलवाडी फाटा येथे फक्त पोलिसांचीच गर्दी दिसून आली. याठिकाणी भाविक-पोलिसांत वादविवादाचेही दर्शन घडून आले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या नित्य नैमित्तिक तिन्ही त्रिकाल पूजा परंपरेनुसार झाल्यानंतर दुपारी तीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडून मंदिराच्या प्रांगणातून फेरी मारून त्र्यंबकराजाची पालखी मंदिराबाहेर काढण्यात आली. शाही लवाजम्यात पालखी सजवली होती. पेशवाई पोशाखात पालखीचे भालदार, चोपदार पुढे चालत होते. या पालखी मिरवणुकीत मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव, आदी अधिकारी यांच्यासह विश्वस्त चेअरमन विकास कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी तथा देवस्थानचे सचिव संजय जाधव, दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, भुषण अडसरे हे सहभागी झाले होते. कुशावर्तावर देवाची पूजा, स्नान, आरती, पुष्पांजली झाली. यावेळी चिन्मय फडके, गिरीष तथा अतुल जोशी यांनी पूजाविधी पार पाडला. पुनश्च पालखी परतीच्या मार्गाने पारंपरिक वाद्यवृंदाच्या जयघोषात मंदिरात परतली.

इन्फो

ब्रह्मगिरीची फेरी बंदच

दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीच्या फेरीला लाखोने गर्दी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीच्या फेरीला मनाई करण्यात आली होती. तरीही काही भाविकांनी खुष्कीच्या मार्गाने जात फेरीचा आनंद लुटलाच. मंदिर बंद ठेवण्यात आले असले तरी गावातील अन्य सर्व व्यवहार सुरळीत होते. यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत. ६ सप्टेंबर रोजी सोमवती अमावास्या आहे. या दिवशीही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.