शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच शिवभक्तांनी घातले लोटांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:18 IST

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच ...

त्र्यंबकेश्वर : श्रावणातील तिसऱ्या व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या सोमवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच लोटांगण घालत भोलेनाथाची आराधना केली. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली.

श्रावणमासातही मंदिर खुले न झाल्याने निराश भाविकांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वारावरच डोके टेकविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाही बंद ठेवली आहे. त्र्यंबकेश्वरला श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी लाखो भाविक जमा होत असतात. परंतु, यंदा कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने भाविकांची वर्दळ कमी दिसून आली. सोमवारी उत्तररात्री पेगलवाडी फाटा येथे फक्त पोलिसांचीच गर्दी दिसून आली. याठिकाणी भाविक-पोलिसांत वादविवादाचेही दर्शन घडून आले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या नित्य नैमित्तिक तिन्ही त्रिकाल पूजा परंपरेनुसार झाल्यानंतर दुपारी तीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडून मंदिराच्या प्रांगणातून फेरी मारून त्र्यंबकराजाची पालखी मंदिराबाहेर काढण्यात आली. शाही लवाजम्यात पालखी सजवली होती. पेशवाई पोशाखात पालखीचे भालदार, चोपदार पुढे चालत होते. या पालखी मिरवणुकीत मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव, आदी अधिकारी यांच्यासह विश्वस्त चेअरमन विकास कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी तथा देवस्थानचे सचिव संजय जाधव, दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, भुषण अडसरे हे सहभागी झाले होते. कुशावर्तावर देवाची पूजा, स्नान, आरती, पुष्पांजली झाली. यावेळी चिन्मय फडके, गिरीष तथा अतुल जोशी यांनी पूजाविधी पार पाडला. पुनश्च पालखी परतीच्या मार्गाने पारंपरिक वाद्यवृंदाच्या जयघोषात मंदिरात परतली.

इन्फो

ब्रह्मगिरीची फेरी बंदच

दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीच्या फेरीला लाखोने गर्दी असते. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीच्या फेरीला मनाई करण्यात आली होती. तरीही काही भाविकांनी खुष्कीच्या मार्गाने जात फेरीचा आनंद लुटलाच. मंदिर बंद ठेवण्यात आले असले तरी गावातील अन्य सर्व व्यवहार सुरळीत होते. यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत. ६ सप्टेंबर रोजी सोमवती अमावास्या आहे. या दिवशीही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.