शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

चारा छावण्यांसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

By admin | Updated: March 8, 2016 22:50 IST

चारा छावण्यांसाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

 येवला : शेतकऱ्यांचा जनावरांसह आंदोलनात सहभागयेवला : तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात, वाड्या-वस्त्या तसेच ग्रामीण भागातील जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, युवानेते संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, जनावरांना चारा मिळालाच पाहिजे, पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा विविध घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.यावेळी बोलताना सुहास कांदे म्हणाले की, येवला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावा. जनावरांना मुबलक चारा मिळावा म्हणून चारा छावण्या उभारण्यात याव्यात. या मागण्या मार्गी न लागल्यास महसूल विभागाच्या विरोधात शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा सुहास कांदे यांनी यावेळी दिला. संभाजीराजे पवार, भास्कर कोंढरे पाटील, चंद्रकांत शिंदे, झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, सर्जेराव सावंत, राजेंद्र लोणारी यांचीही भाषणे झाली. दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात दीपक भदाणे, राहुल लोणारी, भगिनाथ थोरात, रु पेश लोणारी, महेश सरोदे, चंद्रमोहन मोरे, नितीन संसारे, समीर समदडिया, दिलीप मेंगाळ, रतन बोरनारे, कैलास घोरपडे आदिंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)