शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक ...

पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना समर्थक सरपंच तर उपसरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यरत होते. यंदा मात्र गावातील राजकारणाची हवा बदलत असून, दोन गटांमध्ये निवडणूक होताना कोणत्या राजकीय गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावरच उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू आहे. लहवितच्या मतदार यादीत थेट भगूर रस्त्यावर राहणारे व छावणी परिषदेत मतदानाचा हक्क बजावणारे मतदारांची संख्या मोठी आहे. लहवित गावातील दोन वाॅर्डांत या मतदारांचा प्रभाव राहू शकणार आहे. काँग्रेेेसचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे तगडे आव्हान नेमके कोणत्या गटाला असणार, त्यावर गावची राजकीय दिशा ठरणार आहे.

वंजारवाडी व लोहशिंगवे हे दोन्ही गावे तालुक्याचे शेवटचे टोक असून, दोन्ही गावांत शिवसैनिक मोठ्या संख्येने असले, तरी विधानसभेच्या मतदानात राष्ट्रवादीला येथून मोठी रसद मिळाली होती. वंजारवाडी येथे दर पंचवार्षिक निवडणुकीत नवीन चेहरा सरपंच होतो, हा मात्र नियम यंदाही राहण्याची शक्यता आहे. लोहशिंगवे येथे मागील निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध लढत झाली होती. गावात अनेक कामे झाली, तरी गावाचा मुख्य रस्त्याचा प्रश्न कायम आहे. दोनवाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच अशोक ठुबेंची एकहाती सत्ता अनेक वर्षांपासून असून, गावात पक्षापेक्षा सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन चालणाऱ्या पद्धतीमुळे येत्या निवडणुकीत काही बदल होतो का नाही, हे बघावे लागणार आहे.

नानेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा इच्छुकांची संख्या अधिक असून, काही वाॅर्डात तर घरातच दोन उमेदवार उभे राहण्याबाबत घोषणा करताना समर्थक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. गावातून जाणारा नाशिक-पुणे रेल्वे मार्ग योग्य का अयोग्य, या मुद्द्याऐवजी बाहुबली समर्थक तू का मी, यावरच राजकीय वातावरण तापू लागले आहे. बेलतगव्हाण व शेवगेदारणा ही गावे शिवसेनेचे बाल्लेकिल्ले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकारण बदलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. शेवगेदारणा गाव छोटे असले, तरी राजकीय धुंरधर मात्र दर पंचवार्षिक निवडणुकीसाठी नवनवीन गणिते आखत असतात. उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, तत्पूर्वीच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच कोण कोणाचे उमेदवार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.