शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक ...

पाच वर्षांत ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक सरकारी कामे करणारी ग्रामपंचायत म्हणून लहवित गावची ओळख तयार झाली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना समर्थक सरपंच तर उपसरपंचपदी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी कार्यरत होते. यंदा मात्र गावातील राजकारणाची हवा बदलत असून, दोन गटांमध्ये निवडणूक होताना कोणत्या राजकीय गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावरच उमेदवारांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू आहे. लहवितच्या मतदार यादीत थेट भगूर रस्त्यावर राहणारे व छावणी परिषदेत मतदानाचा हक्क बजावणारे मतदारांची संख्या मोठी आहे. लहवित गावातील दोन वाॅर्डांत या मतदारांचा प्रभाव राहू शकणार आहे. काँग्रेेेसचे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे तगडे आव्हान नेमके कोणत्या गटाला असणार, त्यावर गावची राजकीय दिशा ठरणार आहे.

वंजारवाडी व लोहशिंगवे हे दोन्ही गावे तालुक्याचे शेवटचे टोक असून, दोन्ही गावांत शिवसैनिक मोठ्या संख्येने असले, तरी विधानसभेच्या मतदानात राष्ट्रवादीला येथून मोठी रसद मिळाली होती. वंजारवाडी येथे दर पंचवार्षिक निवडणुकीत नवीन चेहरा सरपंच होतो, हा मात्र नियम यंदाही राहण्याची शक्यता आहे. लोहशिंगवे येथे मागील निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध लढत झाली होती. गावात अनेक कामे झाली, तरी गावाचा मुख्य रस्त्याचा प्रश्न कायम आहे. दोनवाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच अशोक ठुबेंची एकहाती सत्ता अनेक वर्षांपासून असून, गावात पक्षापेक्षा सर्वांना एकत्रित बरोबर घेऊन चालणाऱ्या पद्धतीमुळे येत्या निवडणुकीत काही बदल होतो का नाही, हे बघावे लागणार आहे.

नानेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा इच्छुकांची संख्या अधिक असून, काही वाॅर्डात तर घरातच दोन उमेदवार उभे राहण्याबाबत घोषणा करताना समर्थक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. गावातून जाणारा नाशिक-पुणे रेल्वे मार्ग योग्य का अयोग्य, या मुद्द्याऐवजी बाहुबली समर्थक तू का मी, यावरच राजकीय वातावरण तापू लागले आहे. बेलतगव्हाण व शेवगेदारणा ही गावे शिवसेनेचे बाल्लेकिल्ले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकारण बदलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. शेवगेदारणा गाव छोटे असले, तरी राजकीय धुंरधर मात्र दर पंचवार्षिक निवडणुकीसाठी नवनवीन गणिते आखत असतात. उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली असून, तत्पूर्वीच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच कोण कोणाचे उमेदवार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.