शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

१९९७ पासूनच शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:19 IST

राज्यात शिवसेना-भाजप युती दीर्घकाळ टिकली. या दरम्यान, नाशिक महापालिका आणि जिल्हा परीषदेत उभय पक्षाची सत्ता आली असली तरी दोन्ही ...

राज्यात शिवसेना-भाजप युती दीर्घकाळ टिकली. या दरम्यान, नाशिक महापालिका आणि जिल्हा परीषदेत उभय पक्षाची सत्ता आली असली तरी दोन्ही पक्षांत खदखद मात्र कायम होती. जिल्हा परिषदेच्या १९९७ च्या दरम्यान युतीने निवडणूक लढवण्यात आली. काठावर बहुमत असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक कठीण होती. मात्र त्यानंतरही भाजपाच्या एका महिला जिल्हा परिषद सदस्याने गद्दारी केली असा ठपका ठेवत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींनी त्यांना जिल्हा परिषदेच्या बाहेरच दणका दिला तसेच वसंत स्मृतीवर हल्ला बोल केला होता त्यावेळी भाजपाच्या वतीने तेव्हा नगरसेविका असलेल्या देवयांनी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष झाला होता.

त्यानंतर अलीकडील काळात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर भाजप कार्यालयात कुत्रे नेऊन सोडण्यात आले होते तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण यावरून ताण वाढत असताना शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी सेना कार्यालयासमोर फलक लावून भाजपाचा खिजवले होते.

अलीकडील काळात हा संघर्ष वाढला असला तरी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील अनेकदा वाद आणि संघर्ष झाले आहेत. राज्यात भाजपाची सत्ता असतानाच महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकार यांच्या एका वादग्रस्त विधानावरून नाशिक पुणे रोडवर श्रीकृष्ण लॉन्स येथे सुरू असलेले महिला मेळावा उधळण्याचा प्रयत्न शिवसेना महिला आघाडीने (कै.) सत्यभामा गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली केला होता. नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या निवडणूकीत देखील शिवसेनेने बाबुराव आढाव उपसभापतीपदाच्या निवडणूकीत पराभूत झाल्याने देखील भाजपाच्या सदस्यावर गद्दारीचे आरोप करीत त्यांना बदडून काढले होते.

इन्फो...

नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष कायम असला तरी त्यात भाजप कार्यालयावर हल्लाबोल नवीन नाही. २०१२ मध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेशी युती तोडण्यामागे या वादाची देखील किनार होती.

इन्फो...

शिवसेनेच्या वतीने भाजपा कार्यकर्ते किंवा पक्ष कार्यालयावर हल्ले यापूर्वी देखील झाले आहेत. मात्र, पूर्वी सबुरीने घेणारे भाजपचे पदाधिकारी आता प्रत्युत्तर देऊ लागले आहेत हे विशेष होय.