शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
3
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
4
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
5
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
6
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
7
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
8
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
9
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
10
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
11
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
12
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
13
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
14
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
15
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
16
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
17
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
18
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
19
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
20
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव

अवघ्या एका तासातच संपली ‘शिवभोजन थाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्रतिसाद : दुसऱ्या दिवशीही केंद्रांबाहेर लागल्या रांगा; शहरातील तीनही केंद्रांवर गर्दी

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या थाळीसाठी सकाळी ११ वाजेपासूनच अनेक गरजूंनी रांगा लावल्याचे दिसून आले. शहरातील अन्य केंद्रांमध्येदेखील शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कॅन्टीन, पंचवटीतील बाजार समिती येथील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वेस्थानक बाहेरील दीपक रेस्टारंट या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात झाली. मालेगावला बाजार समितीत येथील केंद्रालाही सुरुवात झाली. प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळीची मर्यादा देण्यात आली आहे.शिवभोजन योजनेच्या शुभारंभानंतर दुसºया दिवशी सर्वच केेंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील केंद्रावर सकाळी ११.३० वाजेपासूनच रांग लागली होती. थाळींची तसेच वेळेचीही मर्यादा असल्याने प्रथम येणाºयास प्राधान्य याप्रमाणे योजनेचा लाभ दिला जात असल्याने पहिल्या तासाभरातच १५० थाळींचा कोटा पूर्ण झाला. त्यामुळे अन्य लोकांना माघारी परतावे लागले. या योजनेच्या शुभारंभापासून थाळीविषयीची चर्चा सुरू असून, या थाळीचाआस्वाद घेण्यासाठी दुसºया दिवशी विशेष गर्दी दिसून आली. पहिल्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असल्याने आणि या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे अनेकदा केंद्रापर्यंत पोहोचता आले नव्हते. दुसºया दिवशी मात्र सकाळी ११ वाजेपासूनच केंद्राबोहर लाभार्थी दिसून आले.शुभारंभाच्या दिवशी जिल्ह्यातील चारही केंद्रांवरील ६०० थाळींपैकी ५५९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानुसार शहरातील तीनही केंद्रांवरील शिवभोजन थाळी मिळवण्यासाठी गर्दी दिसून आली. मालेगावला मात्र पहिल्या दिवशी ११७ लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शहरातील तीनही केंद्रांवर दुसºया दिवशीदेखील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. लाभाार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना रांगेत कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :foodअन्न