शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवघ्या एका तासातच संपली ‘शिवभोजन थाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्रतिसाद : दुसऱ्या दिवशीही केंद्रांबाहेर लागल्या रांगा; शहरातील तीनही केंद्रांवर गर्दी

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या थाळीसाठी सकाळी ११ वाजेपासूनच अनेक गरजूंनी रांगा लावल्याचे दिसून आले. शहरातील अन्य केंद्रांमध्येदेखील शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कॅन्टीन, पंचवटीतील बाजार समिती येथील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वेस्थानक बाहेरील दीपक रेस्टारंट या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात झाली. मालेगावला बाजार समितीत येथील केंद्रालाही सुरुवात झाली. प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळीची मर्यादा देण्यात आली आहे.शिवभोजन योजनेच्या शुभारंभानंतर दुसºया दिवशी सर्वच केेंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील केंद्रावर सकाळी ११.३० वाजेपासूनच रांग लागली होती. थाळींची तसेच वेळेचीही मर्यादा असल्याने प्रथम येणाºयास प्राधान्य याप्रमाणे योजनेचा लाभ दिला जात असल्याने पहिल्या तासाभरातच १५० थाळींचा कोटा पूर्ण झाला. त्यामुळे अन्य लोकांना माघारी परतावे लागले. या योजनेच्या शुभारंभापासून थाळीविषयीची चर्चा सुरू असून, या थाळीचाआस्वाद घेण्यासाठी दुसºया दिवशी विशेष गर्दी दिसून आली. पहिल्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असल्याने आणि या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे अनेकदा केंद्रापर्यंत पोहोचता आले नव्हते. दुसºया दिवशी मात्र सकाळी ११ वाजेपासूनच केंद्राबोहर लाभार्थी दिसून आले.शुभारंभाच्या दिवशी जिल्ह्यातील चारही केंद्रांवरील ६०० थाळींपैकी ५५९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानुसार शहरातील तीनही केंद्रांवरील शिवभोजन थाळी मिळवण्यासाठी गर्दी दिसून आली. मालेगावला मात्र पहिल्या दिवशी ११७ लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शहरातील तीनही केंद्रांवर दुसºया दिवशीदेखील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. लाभाार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना रांगेत कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :foodअन्न