शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शरद पवार : जैतापूरला राष्ट्रवादीचा पाठिंबा

By admin | Updated: April 12, 2015 00:48 IST

विरोध करण्यापेक्षा सेनेने सत्तेतून बाहेर पडावे

नाशिक : एकीकडे केंद्रात व राज्यात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी एखादा प्रकल्प उभा राहत असेल तर, त्याला विरोध करायचा. त्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर केली आहे.तसेच स्वस्त आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली वीज जैतापूर प्रकल्पातून मिळणार असेल तर, आमचे सरकारला सहकार्यच असेल, अशा शब्दात शरद पवार यांनी जैतापूर प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबाच असेल, असे सांगत एकप्रकारे पुन्हा एकदा शिवसेनेला एकटे पाडत भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.तारापूर अणुप्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूप्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांनी विरोध करणे ही गोष्ट चुकीची आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)