शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

शिवडीची द्राक्षे पोहोचली राजभवनात

By admin | Updated: February 1, 2015 00:19 IST

चुंबळेंनी दिली भेट : नुकसानभरपाईचेही घातले साकडे

नाशिक : नाशिक दौऱ्यावर मुक्कामी आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निफाड तालुक्यातील शिवडी येथील द्राक्ष निर्यातदार मधुकर क्षीरसागर यांची द्राक्ष त्यांच्या कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी नागलवाडी येथे दिले. द्राक्ष देण्याबरोबरच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान शासनाने तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याशी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सविस्तर चर्चा केली. द्राक्ष, डाळींब व इतर पिके घेताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, पिके घेताना घ्यावयाची मेहनत व येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत गारपीट, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान याबाबत माहिती दिली. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्णातील द्राक्षासह डाळींब, कांदा उत्पादकांचे तसेच अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसानभरपाईबाबत घोषणा झालेली आहे, प्रत्यक्षात नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही विजयश्री चुंबळे यांनी राज्यपालांकडे केली. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर पोहोचण्याबाबत शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नाशिकच्या शिवडीची द्राक्ष यानिमित्ताने राजभवनात पोहोचल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)