शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:33 IST

कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला असून, शालेय परिसरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा शेती व बागेसाठी उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमानूर : शेती व बागेसाठी पाण्याचा वापर होणार

कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला असून, शालेय परिसरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा शेती व बागेसाठी उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.गुरु दत्त शिक्षण संस्थेच्या मानूर परिसरात शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, शरद पवार ज्युनिअर कॉलेज, अजितदादा पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी, कॉलेज आॅफ डी. फार्मसी , बी. फार्मसी, एम. फार्मसी, प्रेरणा फाउण्डेशन आदी शैक्षणिक संकुलांमध्ये २५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, निवासी शाळा आहे.या शैक्षणिक संस्थांमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त गटार करण्यात आली असून, त्या गटारीतून परिसरातील सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी एकत्र करून तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुद्धीकरण झालेले पाणी शेती व शालेय परिसरातील बागांना वापरण्यात येणार आहे. पाणी बचत व जल प्रदूषण रोखण्यासाठी पारंपरिक जलशुद्धीकरण प्रक्रि या पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड देऊन अत्यंत उपयुक्त अशा सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे.डी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित शरद पवार इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा असल्याने व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी निवासी असल्याने दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेतले होते, ते पूर्णत्वास आले.