शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिक्षक बदल्यांमधील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:29 IST

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक्यता फेटाळून लावणाºया जिल्हा परिषदेकडे अजूनही ढीगभर तक्रारी असतानाही शिक्षण विभाग मात्र बचावात्मक भूमिका घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मात्र अभय

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक्यता फेटाळून लावणाºया जिल्हा परिषदेकडे अजूनही ढीगभर तक्रारी असतानाही शिक्षण विभाग मात्र बचावात्मक भूमिका घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी राबविलेली बदलीप्रक्रिया अनेकविध कारणांमुळे वादग्रस्त ठरली आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांवर गैरप्रकाराविषयी आरोपदेखील करण्यात आले. बदलीसाठी शिक्षकांकडून चुकीची माहिती भरण्यात आल्यानंतरची सुमारे ११२ प्रकरणे सप्रमाण जिल्हा परिषदेकडे सादर करूनही जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी यामध्ये कपात करीत फक्त ८२ प्रकरणांवर संशय व्यक्त केला. नंतरच्या काळात तर केवळ २२ प्रकरणेच तपासण्यात आली.विशेष म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये घोळ घालणाºया यंत्रणेनेच्या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यामुळे या प्रकरणातीलसत्यता दडून राहिली. त्यामुळे गैरप्रकाराची उघड चर्चा आणि कागदपत्रे शिक्षण विभागाच्या हाती देऊनही यातून अपेक्षित चौकशी होऊ शकली नाही.जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आॅनलाइन प्रक्रि या राबविताना ट्रान्स्फर पोर्टल हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्ह्णातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांना बदलीसाठी २० आॅनलाइन विकल्प देण्यात आले होते. परंतु हे विकल्प भरताना शिक्षकांनी शासनाची फसवणूक केली. विशेष म्हणजे शिक्षकांनी बदलीसाठीचे गाव आणि शाळा ‘सिलेक्ट’ केल्यानंतर ते लॉक होणे अपेक्षित असताना तो पर्याय खुलाच राहिला आणि त्यामुळे अनेक शिक्षकांनी तोच तोच आॅप्शन निवडला. हा तांत्रिक दोषही शासनाने मान्य केला नाही.जिल्हा परिषदेनेदेखील काही तांत्रिक दोष मान्य केले. विशेष म्हणजे चुकीच्या बदल्या शोधून देण्याचे काम इतर शिक्षकांनीच करावे याच मानसिकतेतून जिल्हा परिषदेने चुकांकडे दुर्लक्ष केले आणि संशयास्पद शिक्षकांचे आक्षेप अमान्य करीत त्यांना प्रक्रियेत कायम ठेवणाºया शिक्षण विभागातील अधिकाºयांवर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही. ते शिक्षक न्यायालयातचुकीची माहिती भरून बदलीचा लाभ मिळविल्याप्रकरणी ज्या नऊ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती त्या शिक्षकांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. या शिक्षकांच्या कागदपत्रांची म्हणे पुन्हा तपासणी होणार आहे. बदलीनंतरही गैरहजर राहणाºया शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली नाही तर गैरहजर असतानाही अशा शिक्षकांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.थेट कारवाई का नाही?इगतपुरी येथील बदल्यांमधील गैरप्रकार प्रकरणी मुख्याध्यापक आणि गटशिक्षण अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. या आदेशाविषयीदेखील चर्चा असून, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी थेट कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.