शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

सातबारा, फेरफार नोंदीचे काम बंद

By admin | Updated: November 13, 2016 01:02 IST

तलाठ्यांचे आंदोलन : नागरिकांचे हाल

नाशिक : तीन दिवसांपूर्वी राज्य पातळीवर धरणे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे पाहून तलाठी संघटनेने अखेर सातबारा व फेरफार नोंदीचे काम करणाऱ्या संगणकाचे डिजिटल सिग्नेचर सिस्टीम म्हणजेच संगणकाची कळच गुरुवारी तहसीलदारांना सुपूर्द केल्याने संपूर्ण राज्यात सातबारा उताऱ्याचे वितरण तसेच फेरफार नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. शासन पातळीवर गेल्या दोन दिवसांत काहीच तोडगा निघालेला नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.तलाठी सजांची पुनर्रचना व मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह दैनंदिन कामकाज करताना तलाठ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तलाठी संघटना राज्यपातळीवर आंदोलन करीत असून, शासनाने वेळोवेळी निव्वळ आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून दि. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तलाठी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज केले, त्यानंतर सोमवारी राज्यभर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. शासनाने त्याची दखल न घेतल्याने दि. १० रोजी सर्व तलाठ्यांनी संगणकाची कळ तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहे. सध्या सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण झाले असून, जमीनविषयक व्यवहारांच्या नोंदी म्हणजेच फेरफारदेखील संगणकावरच केले जात आहे. ही दोन्ही कामे संगणकावरच केली जात असून, ते करण्यासाठी प्रत्येक तलाठ्यास डिजिटल स्वाक्षरीची सोय संगणकातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आंदोलनात तलाठ्यांनी ही सोयच तहसीलदारांकडे सोपविली आहे. त्यामुळे संगणकांवर केली जाणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.