शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सातबारा, फेरफार नोंदीचे काम बंद

By admin | Updated: November 13, 2016 01:02 IST

तलाठ्यांचे आंदोलन : नागरिकांचे हाल

नाशिक : तीन दिवसांपूर्वी राज्य पातळीवर धरणे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे पाहून तलाठी संघटनेने अखेर सातबारा व फेरफार नोंदीचे काम करणाऱ्या संगणकाचे डिजिटल सिग्नेचर सिस्टीम म्हणजेच संगणकाची कळच गुरुवारी तहसीलदारांना सुपूर्द केल्याने संपूर्ण राज्यात सातबारा उताऱ्याचे वितरण तसेच फेरफार नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. शासन पातळीवर गेल्या दोन दिवसांत काहीच तोडगा निघालेला नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.तलाठी सजांची पुनर्रचना व मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह दैनंदिन कामकाज करताना तलाठ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तलाठी संघटना राज्यपातळीवर आंदोलन करीत असून, शासनाने वेळोवेळी निव्वळ आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून दि. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तलाठी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज केले, त्यानंतर सोमवारी राज्यभर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. शासनाने त्याची दखल न घेतल्याने दि. १० रोजी सर्व तलाठ्यांनी संगणकाची कळ तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहे. सध्या सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण झाले असून, जमीनविषयक व्यवहारांच्या नोंदी म्हणजेच फेरफारदेखील संगणकावरच केले जात आहे. ही दोन्ही कामे संगणकावरच केली जात असून, ते करण्यासाठी प्रत्येक तलाठ्यास डिजिटल स्वाक्षरीची सोय संगणकातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आंदोलनात तलाठ्यांनी ही सोयच तहसीलदारांकडे सोपविली आहे. त्यामुळे संगणकांवर केली जाणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.