शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सूर्योदयचे सात वाङ्मय पुरस्कार जाहीर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

नाशिक : साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने उस्मानाबादचे प्रा भास्कर चंदनशिव, कोल्हापूरचे प्रा. डाॅ. विश्वनाथ शिंदे, ...

नाशिक : साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने उस्मानाबादचे प्रा भास्कर चंदनशिव, कोल्हापूरचे प्रा. डाॅ. विश्वनाथ शिंदे, नांदेडचे डाॅ, मधु सावंत, पुण्याच्या कवयित्री अंजली कुळकर्णी, नागपूरचे डॉ. म. रा. जोशी, पुण्याचे कवी धनंजय सोलंकर आणि बालसाहित्यासाठी एरंडोलचे ॲड. विलास मोरे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल मंडळाच्या वर्धापनदिनी अध्यक्ष सतीश जैन यांनी सूर्योदय वाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, महाकवी सुधाकर गायधनी, प्रा. डाॅ. म. सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, प्रा. बी. एन. चौधरी, डाॅ. संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर, सावळीराम तिदमे या निवड समितीने या पुरस्कारांसाठी खालील नामवंत लेखकांची निवड केलेली आहे. त्यात प्रख्यात लेखक प्रा. चंदनशिव यांना दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार, तर लेखक डॉ. शिंदे यांना पद्मश्री भवरलाल जैन स्मृती सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार यांना प्रत्येकी २१ हजार आणि मानपत्र, लेखिका डॉ. मधु सावंत यांना कांताबाई भवरलाल जैन स्मृती पुरस्कार, तर कवयित्री अंजली कुळकर्णी यांना बन्सीलाल शिवराज जैन, कांतीलाल हिरालाल चोरडिया स्मरणार्थ सूर्योदय साहित्य भूषण असे ११ हजार रुपये आणि मानपत्र हे पुरस्कार प्रदान कर‌ण्यात आले, तर संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना बदामबाई हेमराज देसर्डा आणि पन्नालाल भंडारी स्मृती पुरस्कार आणि कवी धनंजय सोलंकर यांना राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार प्रत्येकी ११ हजार रुपये आणि मानपत्र देण्यात येणार आहे. ॲड. मोरे यांना लीलाबाई दलिचंद जैन हा पाच हजार रकमेचा बालसाहित्य पुरस्कार, असे राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याशिवाय गोकुळचंद लाहोटी स्मृती सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार इगतपुरीतील आहुर्लीचे लेखक नवनाथ गायकर यांना दोन हजार पाचशे रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जळगावी जानेवारी २०२२मध्ये नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान सोहळा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.