शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सात विद्यार्थिनींची प्रकृ ती खालावली

By admin | Updated: September 29, 2015 23:55 IST

विषबाधा प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

दिंडोरी : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३१ मुलीना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने सोमवारी (दि. २८) त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मंगळवारी (दि. २९) आणखी पंधरा मुलींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विद्यार्थिनी गंभीर स्थितीत असतानाही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी वेळेवर हजर होऊ शकले नसल्याने रुग्णालयातील एकंदर ढिसाळ कारभाराचा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पालक, पत्रकार व कार्यकर्ते यांच्या भेटीने मुलींची प्रकृती मानसिक दबाव येत असल्याने बिघडत असल्याचा जावईशोध लावला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. २९) पंधरा मुलीना उलट्या, जुलाब, थंडी- तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ललिता जाधव, हर्षदा झिरवाळ, प्रियंका झणकर, सुरेखा गायकवाड, लता गांगोडे, शैला डगळे, सुमित्रा राऊत, सविता खोटरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलींची प्रकृती गंभीर होत असताना केवळ परिचारिका वानखेडे या एकमेव उपचार करीत होत्या. वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावून घ्यावे लागले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिरते पथक वरच्या वरच फिरकून गेले. प्रत्यक्ष वैद्यकीय अधीक्षक सूर्यवंशी यांनी फिरत्या पथकाला तिथेच थांबण्याचे आदेश देऊनही पथकाने ते जुमानले नाही. यावरून रुग्णालयावर कोणाचाही वचक नसल्याचा प्रत्यय आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आला. झिरवाळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावूनही त्यांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सद्यस्थितीत मालती पवार, कलावती गायकवाड, रेखा तुंगार, ललिता गायकवाड, तारा महाले, छाया गावंडे, कांचन राऊत या उपचार घेत आहे. परिस्थितीची दाखल घेत अप्पर आयुक्त अशोक लोखंडे, प्रकल्प अधिकारी गोलायीत, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, रासकर यांनी वसतीगृहातील विद्यार्थिनीची चौकशी करून या विद्याथीनींना अन्नातून विषबाधा झाली कि अन्य काही कारनास्तव उलट्या व जुलाबाचा त्रास झाला हे प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात विषबाधेचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधान आले असून, सर्व शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर वसतीगृहातील मुलीच्या विषबाधेच्या प्रकारामुळे दिंडोरीतील वस्तीगृहातील मुलांमध्यही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)