शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

सात विद्यार्थिनींची प्रकृ ती खालावली

By admin | Updated: September 29, 2015 23:55 IST

विषबाधा प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

दिंडोरी : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३१ मुलीना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने सोमवारी (दि. २८) त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मंगळवारी (दि. २९) आणखी पंधरा मुलींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विद्यार्थिनी गंभीर स्थितीत असतानाही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी वेळेवर हजर होऊ शकले नसल्याने रुग्णालयातील एकंदर ढिसाळ कारभाराचा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पालक, पत्रकार व कार्यकर्ते यांच्या भेटीने मुलींची प्रकृती मानसिक दबाव येत असल्याने बिघडत असल्याचा जावईशोध लावला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. २९) पंधरा मुलीना उलट्या, जुलाब, थंडी- तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ललिता जाधव, हर्षदा झिरवाळ, प्रियंका झणकर, सुरेखा गायकवाड, लता गांगोडे, शैला डगळे, सुमित्रा राऊत, सविता खोटरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलींची प्रकृती गंभीर होत असताना केवळ परिचारिका वानखेडे या एकमेव उपचार करीत होत्या. वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावून घ्यावे लागले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिरते पथक वरच्या वरच फिरकून गेले. प्रत्यक्ष वैद्यकीय अधीक्षक सूर्यवंशी यांनी फिरत्या पथकाला तिथेच थांबण्याचे आदेश देऊनही पथकाने ते जुमानले नाही. यावरून रुग्णालयावर कोणाचाही वचक नसल्याचा प्रत्यय आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आला. झिरवाळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावूनही त्यांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सद्यस्थितीत मालती पवार, कलावती गायकवाड, रेखा तुंगार, ललिता गायकवाड, तारा महाले, छाया गावंडे, कांचन राऊत या उपचार घेत आहे. परिस्थितीची दाखल घेत अप्पर आयुक्त अशोक लोखंडे, प्रकल्प अधिकारी गोलायीत, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, रासकर यांनी वसतीगृहातील विद्यार्थिनीची चौकशी करून या विद्याथीनींना अन्नातून विषबाधा झाली कि अन्य काही कारनास्तव उलट्या व जुलाबाचा त्रास झाला हे प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात विषबाधेचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधान आले असून, सर्व शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर वसतीगृहातील मुलीच्या विषबाधेच्या प्रकारामुळे दिंडोरीतील वस्तीगृहातील मुलांमध्यही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)