शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सात विद्यार्थिनींची प्रकृ ती खालावली

By admin | Updated: September 29, 2015 23:55 IST

विषबाधा प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

दिंडोरी : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३१ मुलीना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने सोमवारी (दि. २८) त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मंगळवारी (दि. २९) आणखी पंधरा मुलींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विद्यार्थिनी गंभीर स्थितीत असतानाही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी वेळेवर हजर होऊ शकले नसल्याने रुग्णालयातील एकंदर ढिसाळ कारभाराचा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पालक, पत्रकार व कार्यकर्ते यांच्या भेटीने मुलींची प्रकृती मानसिक दबाव येत असल्याने बिघडत असल्याचा जावईशोध लावला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. २९) पंधरा मुलीना उलट्या, जुलाब, थंडी- तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ललिता जाधव, हर्षदा झिरवाळ, प्रियंका झणकर, सुरेखा गायकवाड, लता गांगोडे, शैला डगळे, सुमित्रा राऊत, सविता खोटरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलींची प्रकृती गंभीर होत असताना केवळ परिचारिका वानखेडे या एकमेव उपचार करीत होत्या. वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावून घ्यावे लागले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिरते पथक वरच्या वरच फिरकून गेले. प्रत्यक्ष वैद्यकीय अधीक्षक सूर्यवंशी यांनी फिरत्या पथकाला तिथेच थांबण्याचे आदेश देऊनही पथकाने ते जुमानले नाही. यावरून रुग्णालयावर कोणाचाही वचक नसल्याचा प्रत्यय आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आला. झिरवाळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावूनही त्यांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सद्यस्थितीत मालती पवार, कलावती गायकवाड, रेखा तुंगार, ललिता गायकवाड, तारा महाले, छाया गावंडे, कांचन राऊत या उपचार घेत आहे. परिस्थितीची दाखल घेत अप्पर आयुक्त अशोक लोखंडे, प्रकल्प अधिकारी गोलायीत, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, रासकर यांनी वसतीगृहातील विद्यार्थिनीची चौकशी करून या विद्याथीनींना अन्नातून विषबाधा झाली कि अन्य काही कारनास्तव उलट्या व जुलाबाचा त्रास झाला हे प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात विषबाधेचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधान आले असून, सर्व शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर वसतीगृहातील मुलीच्या विषबाधेच्या प्रकारामुळे दिंडोरीतील वस्तीगृहातील मुलांमध्यही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)