शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

जिल्ह्यातील सात धरणे हाउसफुल्ल

By admin | Updated: August 4, 2016 01:14 IST

विसर्ग सुरूच : सरासरी ५३ टक्के साठा

नाशिक : पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये जवळपास ५३ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यातील सात धरणांनी शंभरी गाठल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. जिल्ह्णातील धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजवर शंभर टक्के धरणे भरल्याची नोंद शासन दरबारी नसली तरी, यंदा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ३४ हजार ७७४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणांमध्ये साठल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त ३४ टक्के इतके म्हणजेच २२ हजार ४२६ दशलक्ष घनफूट पाणी २ आॅगस्टपर्यंत साठले होते. यंदा आॅगस्टमध्ये भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे मध्यम प्रकल्प म्हणजेच धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय करंजवण व वाघाड या धरणांनी नव्वदी पार केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत तेही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्णातील धरण समूहाचा विचार करता, गंगापूर धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा असून, पालखेड धरण समूहात ९२ टक्के, ओझरखेड समूहात ५६ टक्के, दारणा समूहात ७२ टक्के व गिरणा समूहात ५३ टक्के इतकाच साठा आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. बुधवारी गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर या धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर @ ७९ टक्केनाशिक शहरासह मराठवाड्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ७९ टक्के पाणी साठले आहे. या धरण समूहात येणाऱ्या कश्यपी धरणात ८७, तर गौतमी गोदावरीत ७० टक्के इतके पाणी आहे. गंगापूर धरण समूहात सध्या साठलेल्या पाण्यामुळे नाशिककरांची वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय पर्याय नाही. सायंकाळपर्यंत पाऊसनाशिक जिल्ह्णात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २६४ मिमी. पाऊस झाला आहे. यात नाशिक- ५०.५, इगतपुरी ७८.०, त्र्यंबकेश्वर २७.०, दिंडोरी- ३१, पेठ- ५४, निफाड १.६, सिन्नर ८.०, येवला २.४, कळवण १.५, सुरगाणा १०.४ मिमी. या प्रमाणे पाऊस झाला असून चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण येथे निरंक पावसाची नोंद आहे.पुन्हा विसर्ग सुरूसायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून सात हजार ९७४ क्युसेक, दारणामधून २८ हजार ४६६, पालखेडमधून ९००९, तर कडवा मधून ७८०० आणि वालदेवीतून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी नदीतून सात हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असला तरी होळकर पुलाखाली ११ हजार २१० क्युसेक प्रवाह कायम आहे.