शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात धरणे हाउसफुल्ल

By admin | Updated: August 4, 2016 01:14 IST

विसर्ग सुरूच : सरासरी ५३ टक्के साठा

नाशिक : पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये जवळपास ५३ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यातील सात धरणांनी शंभरी गाठल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. जिल्ह्णातील धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजवर शंभर टक्के धरणे भरल्याची नोंद शासन दरबारी नसली तरी, यंदा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ३४ हजार ७७४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणांमध्ये साठल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त ३४ टक्के इतके म्हणजेच २२ हजार ४२६ दशलक्ष घनफूट पाणी २ आॅगस्टपर्यंत साठले होते. यंदा आॅगस्टमध्ये भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे मध्यम प्रकल्प म्हणजेच धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय करंजवण व वाघाड या धरणांनी नव्वदी पार केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत तेही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्णातील धरण समूहाचा विचार करता, गंगापूर धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा असून, पालखेड धरण समूहात ९२ टक्के, ओझरखेड समूहात ५६ टक्के, दारणा समूहात ७२ टक्के व गिरणा समूहात ५३ टक्के इतकाच साठा आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. बुधवारी गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर या धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर @ ७९ टक्केनाशिक शहरासह मराठवाड्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ७९ टक्के पाणी साठले आहे. या धरण समूहात येणाऱ्या कश्यपी धरणात ८७, तर गौतमी गोदावरीत ७० टक्के इतके पाणी आहे. गंगापूर धरण समूहात सध्या साठलेल्या पाण्यामुळे नाशिककरांची वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय पर्याय नाही. सायंकाळपर्यंत पाऊसनाशिक जिल्ह्णात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २६४ मिमी. पाऊस झाला आहे. यात नाशिक- ५०.५, इगतपुरी ७८.०, त्र्यंबकेश्वर २७.०, दिंडोरी- ३१, पेठ- ५४, निफाड १.६, सिन्नर ८.०, येवला २.४, कळवण १.५, सुरगाणा १०.४ मिमी. या प्रमाणे पाऊस झाला असून चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण येथे निरंक पावसाची नोंद आहे.पुन्हा विसर्ग सुरूसायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून सात हजार ९७४ क्युसेक, दारणामधून २८ हजार ४६६, पालखेडमधून ९००९, तर कडवा मधून ७८०० आणि वालदेवीतून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी नदीतून सात हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असला तरी होळकर पुलाखाली ११ हजार २१० क्युसेक प्रवाह कायम आहे.