शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जिल्ह्यातील सात धरणे हाउसफुल्ल

By admin | Updated: August 4, 2016 01:14 IST

विसर्ग सुरूच : सरासरी ५३ टक्के साठा

नाशिक : पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये जवळपास ५३ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यातील सात धरणांनी शंभरी गाठल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. जिल्ह्णातील धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजवर शंभर टक्के धरणे भरल्याची नोंद शासन दरबारी नसली तरी, यंदा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ३४ हजार ७७४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणांमध्ये साठल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त ३४ टक्के इतके म्हणजेच २२ हजार ४२६ दशलक्ष घनफूट पाणी २ आॅगस्टपर्यंत साठले होते. यंदा आॅगस्टमध्ये भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे मध्यम प्रकल्प म्हणजेच धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय करंजवण व वाघाड या धरणांनी नव्वदी पार केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत तेही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्णातील धरण समूहाचा विचार करता, गंगापूर धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा असून, पालखेड धरण समूहात ९२ टक्के, ओझरखेड समूहात ५६ टक्के, दारणा समूहात ७२ टक्के व गिरणा समूहात ५३ टक्के इतकाच साठा आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. बुधवारी गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर या धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर @ ७९ टक्केनाशिक शहरासह मराठवाड्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ७९ टक्के पाणी साठले आहे. या धरण समूहात येणाऱ्या कश्यपी धरणात ८७, तर गौतमी गोदावरीत ७० टक्के इतके पाणी आहे. गंगापूर धरण समूहात सध्या साठलेल्या पाण्यामुळे नाशिककरांची वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय पर्याय नाही. सायंकाळपर्यंत पाऊसनाशिक जिल्ह्णात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २६४ मिमी. पाऊस झाला आहे. यात नाशिक- ५०.५, इगतपुरी ७८.०, त्र्यंबकेश्वर २७.०, दिंडोरी- ३१, पेठ- ५४, निफाड १.६, सिन्नर ८.०, येवला २.४, कळवण १.५, सुरगाणा १०.४ मिमी. या प्रमाणे पाऊस झाला असून चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण येथे निरंक पावसाची नोंद आहे.पुन्हा विसर्ग सुरूसायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून सात हजार ९७४ क्युसेक, दारणामधून २८ हजार ४६६, पालखेडमधून ९००९, तर कडवा मधून ७८०० आणि वालदेवीतून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी नदीतून सात हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असला तरी होळकर पुलाखाली ११ हजार २१० क्युसेक प्रवाह कायम आहे.