शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जिल्ह्यातील सात धरणे हाउसफुल्ल

By admin | Updated: August 4, 2016 01:14 IST

विसर्ग सुरूच : सरासरी ५३ टक्के साठा

नाशिक : पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये जवळपास ५३ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यातील सात धरणांनी शंभरी गाठल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. जिल्ह्णातील धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजवर शंभर टक्के धरणे भरल्याची नोंद शासन दरबारी नसली तरी, यंदा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ३४ हजार ७७४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणांमध्ये साठल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त ३४ टक्के इतके म्हणजेच २२ हजार ४२६ दशलक्ष घनफूट पाणी २ आॅगस्टपर्यंत साठले होते. यंदा आॅगस्टमध्ये भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे मध्यम प्रकल्प म्हणजेच धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय करंजवण व वाघाड या धरणांनी नव्वदी पार केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत तेही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्णातील धरण समूहाचा विचार करता, गंगापूर धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा असून, पालखेड धरण समूहात ९२ टक्के, ओझरखेड समूहात ५६ टक्के, दारणा समूहात ७२ टक्के व गिरणा समूहात ५३ टक्के इतकाच साठा आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. बुधवारी गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर या धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर @ ७९ टक्केनाशिक शहरासह मराठवाड्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ७९ टक्के पाणी साठले आहे. या धरण समूहात येणाऱ्या कश्यपी धरणात ८७, तर गौतमी गोदावरीत ७० टक्के इतके पाणी आहे. गंगापूर धरण समूहात सध्या साठलेल्या पाण्यामुळे नाशिककरांची वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय पर्याय नाही. सायंकाळपर्यंत पाऊसनाशिक जिल्ह्णात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २६४ मिमी. पाऊस झाला आहे. यात नाशिक- ५०.५, इगतपुरी ७८.०, त्र्यंबकेश्वर २७.०, दिंडोरी- ३१, पेठ- ५४, निफाड १.६, सिन्नर ८.०, येवला २.४, कळवण १.५, सुरगाणा १०.४ मिमी. या प्रमाणे पाऊस झाला असून चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण येथे निरंक पावसाची नोंद आहे.पुन्हा विसर्ग सुरूसायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून सात हजार ९७४ क्युसेक, दारणामधून २८ हजार ४६६, पालखेडमधून ९००९, तर कडवा मधून ७८०० आणि वालदेवीतून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी नदीतून सात हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असला तरी होळकर पुलाखाली ११ हजार २१० क्युसेक प्रवाह कायम आहे.