शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साडेसातशे कोटींची उलाढाल होणार ठप्प

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

सलग तीन सुट्या : धनादेश वटणार पाच दिवसांनंतर

नाशिक : आर्थिक वर्षअखेरीसची धामधूम आता जवळपास सर्वच क्षेत्रांत दिसत असून, कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही आर्थिक व्यवहार मात्र अडकून पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजारातील कोट्यवधींची आर्थिक उलाढाल किमान पाच दिवस तरी अडकून पडणार आहे.मार्चअखेरीस जवळपास सर्वच स्तरातील व्यावसायिक आणि उद्योजकांचे ताळेबंद पूर्ण होत असतात. त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी धनादेश महत्त्वाचे माध्यम असते. यंदा वर्ष पूर्ण होताना २८ तारखेला शनिवारी रामनवमीची सुटी आणि रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. त्याशिवाय १ तारखेपासून पुन्हा बॅँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. चारला शनिवार असल्याने त्या दिवशी पुन्हा अर्धाच दिवस बॅँक सुरू असेल आणि रविवारची पुन्हा सुटी असे सलग पाच दिवस बॅँकांचे कामकाज बंद राहणार असल्याने प्रत्येक दिवशी किमान १५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असे गृहीत धरल्यास सुमारे ७५० कोटी रुपयांचे व्यवहार या पाच दिवसांत ठप्प होणार आहेत.