शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंदे्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.महसूल दिनानिमित्त पत्रकारांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.महसूल दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या ३७९ सेवा आॅनलाइन करण्यात आल्या असून, त्यात महसूल विभागाशी निगडित ५१ सेवा आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून नजीकच्या काळात सर्व प्रकारचे शासकीय दाखले आॅनलाइन देण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने सेतू केंद्रात जाऊ नये, अशी त्यामागची कल्पना असून, ‘महा ई-सेवा केंद्र’ व सेतू यांच्या सर्व सेवा महाआॅनलाइनच्या पोर्टलवरून आॅनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने देण्यात येणार आहेत. या प्रणालीमुळे नागरिकांचा सेतू केंद्राच्या चकरा मारण्याचा त्रास वाचेल शिवाय बनावट व चुकीच्या दाखल्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात एक लाख ३० हजार इतक्या नागरिकांना आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आली असून, राज्यात नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तांत्रिक दोष दूर झाल्याने पेठ, सुरगाणा या अतिदुर्गम तालुक्यातही महा आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आता कोणत्याही अडचणी नसल्यामुळे नजीकच्या काळात सेतू केंदे्र बंद करून नागरिकांनी घरी बसल्या शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे सांगून गेल्या महिन्यात जिल्ह्यात बनावट शासकीय दाखले देण्याच्या प्रकारांच्या तक्रारींची दखल घेत दोन केंद्रे रद्द करण्यात आली असून, जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन गुन्हे नाशिकमध्ये व एक कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापुढे नागरिक स्वत:च दाखल्यांसाठी नोंदणी करणार असल्यामुळे बनावट दाखल्यांचा प्रश्नच निर्माण होणार नाही, शिवाय त्यांनी दाखल्यासाठी नोंदणी केल्यास चोवीस तासांच्या आत त्यांना दाखले देण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.