शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

तक्रारींचा महिनाभरात निपटारा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:31 IST

सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. येथील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदेश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.येथील नियोजन भवनात सकाळी ११ वाजता गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जि. प. बांधकाम सभापती मनीषा पवार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनिल लांडगे, उत्तर महाराष्टÑ संघटनमंत्री किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते. यापुढे दर दोन महिन्यांनी अशाप्रकारे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. पहिल्या सत्रात ग्रामीण भागातील तालुकानिहाय तक्रारींचे निराकरण करण्यात आले. नाशिक, निफाड, दिंडोरी, पेठ या क्रमानुसार तालुकानिहाय नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले. सर्वाधिक तक्रारी या निफाड तालुक्यातील होत्या. जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, अमृता पवार, मंदाकिनी बनकर यांनी त्यांच्या गटातील विकासकामे मंजूर करण्याबाबत पत्र दिले होते. अशोक आवारे, सुशीला पाटील, शिवाजी कोठुळे, साहेबराव निरगुडे, सोमनाथ पगारे यांनी वैयक्तिक अडचणी व समस्या मांडल्या, तर नारायण शिंदे यांनी निफाड साखर कारखाना सुरू करावा, यासाठी शेतकºयांची मागणी असल्याचे सांगितले. त्यावर याबाबत तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. शिवरस्ते मंजूर होत नसल्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार अनिल कदम यांनी याबाबत एकत्रित बैठक घेऊन शिवरस्त्यांचा प्रश्न निकाली काढावयास हवा, अशी सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी याबाबत एकत्रित बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. शारदा शेलार व सिंधूताई कदम यांनी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळण्याची मागणी केली. त्यांना आठ दिवसांत यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रे पाहून लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिले. नाशिक, दिंडोरी, पेठ तालुक्यांतूनही अनेक तक्रारींचा पाऊस पडला.भ्रष्टाचार : भाजपा तालुकाध्यक्षाची तक्रार पेठ भाजपा तालुकाध्यक्ष भरत कामडी यांनी पेठ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचे पुरावेच आपण सादर केले असल्याचे सांगितले. पेठ नाशिक रस्त्याचे काम सुरू असताना दहा अपघात होऊन चार जणांचे बळी गेले आहेत. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याकडून मुख्यसेविका ४० टक्के पोषण आहाराचे कमिशन खाते, त्याचेही आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले. यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करून १५ दिवसांत जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दिंडोरीला विमान कारखानाच्तुकाराम जोेंधळे यांनी दिंडोरी तालुक्यातील बहुतांश जमिनींचे अधिग्रहण औद्योगिक विकास महामंडळाने केले आहे. एचएएलसारखा एखादा मोठा प्रकल्प दिंडोरीत आणल्यास जिल्हावासीय आपले नाव कायमचे लक्षात ठेवतील, असे सांगितले. त्यावर महाराष्टÑ औद्योेगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिंडोरीत भूसंपादन सुरू झाले आहे. स्वीडन येथील फायटर प्लेन बनविण्याच्या एका कंपनीने दिंडोरीत विमान कारखाना सुरू करण्याबाबत उत्सुकता दाखविली आहे. त्याबाबत सोमवारी(दि.३०) नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. गिरीश महाजन यांनीही जिल्ह्णात मोठे उद्योग येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.