शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

साधी मनीआॅर्डर सेवा जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू

By admin | Updated: April 4, 2015 01:53 IST

साधी मनीआॅर्डर सेवा जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू

नाशिक : सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेली भारतीय पोस्टाची साधी मनीआॅर्डर सेवा १ एप्रिल रोजी बंद होणार असल्याचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जाहीर केले असले, तरी तसे लेखी आदेश अद्याप टपाल कार्यालयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. दूरसंचार क्रांतीमुळे टपाल खात्याची तारसेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. पारंपरिक मनीआॅर्डर सुविधाही १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचे फेब्रुवारीत जाहीर करण्यात आले. अनेक वर्षांपासून या सेवेशी भारतीयांची नाळ जुळलेली आहे. एका गावातून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची ही विश्वासार्ह पद्धत असल्याने लोकांचा या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला; मात्र गेल्या दशकात इंटरनेट व मोबाइल सेवेचा विकास झाल्यानंतर या सेवेला फारसा प्रतिसाद लाभत नव्हता. टपाल खात्याने काळानुरूप बदल करीत इलेक्ट्रॉनिक मनीआॅर्डर (ईएमओ), मोबाइल मनीआॅर्डर (एमएमओ) व इन्स्टंट मनीआॅर्डर (आयएमओ) या सेवा सुरू केल्या. परिणामी, साध्या मनीआॅर्डरचा वापर आणखी घटला. ही सेवा एप्रिलमध्ये बंद होणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते; मात्र शासनाकडून आदेश नसल्याने ही सेवा अद्याप सुरूच असली, तरी लोकांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प असल्याचे वरिष्ठ पोस्टमास्तर संजय फडके यांनी सांंगितले. (प्रतिनिधी)