शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:55 IST

नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आली असून, त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

ठळक मुद्देगिरीश महाजन : नांदगाव तालुक्यातील दुष्काळाची पाहणी

नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत रत्नाकर पवार, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, बापूसाहेब कवडे आदी.

 

 

नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आली असून, त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील महादेव मंदिराशेजारील ग्रामपंचायतीच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.नार-पार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र बदलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय अधिकारी दौºयात सहभागी होत नसल्याने नेमकेपणाचा निर्णय घेण्यास अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाशी बोलणे झाले असल्याने यंत्रणेबाबतची अडचण दूर झाल्याची माहिती महाजन यांनी दिली.यावेळी डॉ. भारती पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रत्नाकर पवार, तालुका पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष राजेश कवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, किरण देवरे, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मनमाडच्या माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, सुनील पाटील, गंगादादा त्रिभुवन, सजन कवडे, प्रफुल्ल पारख, पंकज खताळ, सुभाष कुटे, विष्णू निकम, भाऊसाहेब हिरे, गणेश शिंदे, संजय फणसे, विठ्ठल अहेर इत्यादी उपस्थित होते.प्रशासकीय यंत्रणेची उदासीनताज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी पालकमंत्री महाजन यांचे स्वागत केले. रोहिणी नक्षत्र पंधरा दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपले असून, दुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेला गती मिळाली नसल्याचे त्यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. टँकरची संख्या वाढविणे, शेतकºयांना शेती करण्यासाठी व पुढील हंगामासाठी बी-बियाणे जनावरांचा चारा व पाणी या महत्त्वाच्या समस्या जाणवणार असल्याचे सांगितले. जनावरांसाठी प्रतिहेक्टर पंचवीस हजार किंवा बैलजोडीस दहा हजार रु पये चाºयासाठी द्यावे, अशी मागणी बाणगाव-खिर्डी पंचक्र ोशीतल्या शेतकºयांच्या वतीने बापूसाहेब कवडे यांनी महाजन यांच्याकडे केली. जनावरांसाठी पाण्याचे टँकर देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. माजी आमदार संजय पवार यांनी ४२ खेडी नळयोजनेतून पाणी मिळत नाही. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.