शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:55 IST

नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आली असून, त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.

ठळक मुद्देगिरीश महाजन : नांदगाव तालुक्यातील दुष्काळाची पाहणी

नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेले पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत रत्नाकर पवार, राजाभाऊ देशमुख, संजय पवार, बापूसाहेब कवडे आदी.

 

 

नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आली असून, त्यासाठी निधीची कसलीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथील महादेव मंदिराशेजारील ग्रामपंचायतीच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.नार-पार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र बदलेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय अधिकारी दौºयात सहभागी होत नसल्याने नेमकेपणाचा निर्णय घेण्यास अडचण येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाशी बोलणे झाले असल्याने यंत्रणेबाबतची अडचण दूर झाल्याची माहिती महाजन यांनी दिली.यावेळी डॉ. भारती पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रत्नाकर पवार, तालुका पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष राजेश कवडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, किरण देवरे, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, मनमाडच्या माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, सुनील पाटील, गंगादादा त्रिभुवन, सजन कवडे, प्रफुल्ल पारख, पंकज खताळ, सुभाष कुटे, विष्णू निकम, भाऊसाहेब हिरे, गणेश शिंदे, संजय फणसे, विठ्ठल अहेर इत्यादी उपस्थित होते.प्रशासकीय यंत्रणेची उदासीनताज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी पालकमंत्री महाजन यांचे स्वागत केले. रोहिणी नक्षत्र पंधरा दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपले असून, दुष्काळाच्या प्रश्नावर यंत्रणेला गती मिळाली नसल्याचे त्यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. टँकरची संख्या वाढविणे, शेतकºयांना शेती करण्यासाठी व पुढील हंगामासाठी बी-बियाणे जनावरांचा चारा व पाणी या महत्त्वाच्या समस्या जाणवणार असल्याचे सांगितले. जनावरांसाठी प्रतिहेक्टर पंचवीस हजार किंवा बैलजोडीस दहा हजार रु पये चाºयासाठी द्यावे, अशी मागणी बाणगाव-खिर्डी पंचक्र ोशीतल्या शेतकºयांच्या वतीने बापूसाहेब कवडे यांनी महाजन यांच्याकडे केली. जनावरांसाठी पाण्याचे टँकर देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. माजी आमदार संजय पवार यांनी ४२ खेडी नळयोजनेतून पाणी मिळत नाही. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.