शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

त्र्यंबकेश्वरमध्ये सेना-भाजपच्या प्रेमाची ‘अशीही’ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

त्र्यंबकेश्वर : सेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्यापासून एकमेकांत विस्तव काही जात नाही. उलट उलटसुलट विधाने करत शब्दांचे निखारे फुलविण्यातच दोन्ही पक्षांचे ...

त्र्यंबकेश्वर : सेना-भाजपमध्ये काडीमोड झाल्यापासून एकमेकांत विस्तव काही जात नाही. उलट उलटसुलट विधाने करत शब्दांचे निखारे फुलविण्यातच दोन्ही पक्षांचे नेते धन्यता मानत आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपची सत्ता आहे, तेथील सत्ताधारी तर महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडत असतात. परंतु, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत भाजपची सत्ता असतानाही युती काळात रखडलेली भूमिगत गटार योजना आघाडी सरकारने मंजूर केल्याने भाजपने चक्क सेनेच्या मंत्रिमहोदयांच्या आभाराचे फलक गावात झळकवले आहेत. शहरातील सेना-भाजपमधील हे प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने सन २०१८ मध्ये राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत मिसळू न देता ते स्वतंत्र पाईपलाईनद्वारे गावाबाहेरील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सोडण्याचा प्रस्ताव तयार केला होता. सुमारे ३९ कि.मी. पाईप गटार संपूर्ण गावातून फिरवून गावाबाहेर ४ कि.मी. अंतरावरील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सोडण्याचे नियोजन होते. नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. दोन स्वीकृत भाजप सदस्य, नगराध्यक्ष व १४ नगरसेवक मोदी लाटेत निवडून आले आहेत, तर अन्य १ अपक्ष व २ शिवसेना नगरसेवक आहेत. नगरपरिषदेने प्रस्ताव केला, तेव्हा राज्यात भाजपचे सरकार होते. त्या काळात भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प भाजप सरकारने मंजूर केला नव्हता. सेना-भाजपची युती तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीच्या आशा मावळल्या होत्या. पण आता तब्बल तीन वर्षांनंतर आघाडी सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला. याबाबतचे पत्र घेण्यासाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी यांना नुकतेच पाचारण केले. त्यानुसार नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, कैलास चोथे व मुख्याधिकारी संजय जाधव यांनी राज्याचे नगरविकासमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आघाडी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे सांगून पहिल्या टप्प्यात ३४ कोटी रुपये मंजूर केल्याचे पत्र नगराध्यक्षांच्या हाती टेकवत आश्चर्याचा धक्का दिला.

इन्फो

काही भाजपेयींची कुरबूर

त्र्यंबक नगरपरिषदेत भाजपची सत्ता असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांनी शहराच्या रखडलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नगरविकास खात्याकडून मंजुरीचे पत्र घेण्यासाठी पाचारण करण्यात आले, तेव्हा काही भाजपच्या नगरसेवकांनी कुरबुरी करत, आपले सरकार नसल्याने कशाला जायचे, असे म्हणत मुंबईला जाणे टाळले. मात्र, शिवसेनेच्या या प्रेमातून उतराई होण्याची संधी भाजप नेत्यांनी सोडली नाही. शहरात एकनाथ शिंदे व आघाडी सरकारचे आभार मानणारे फलक झळकले असून त्यात एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्राला मोठा मान देत छोट्या आकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे छायाचित्र टाकले आहे. प्रसंगानुरूप पक्षनिष्ठा बाजूला ठेवावी, लागते हाच संदेश या फलकातून भाजपने दिल्याची चर्चा आहे.

फोटो- ०८ त्र्यंबकेश्वर नगरपरिषद

080721\08nsk_30_08072021_13.jpg

फोटो- ०८ त्र्यंबकेश्वर नगरपरिषद